शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

जो रोज हरिपाठ गाईल त्याचा देह पवित्र होईल; वाचा नित्य हरिपाठ करण्याचे लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:04 AM

ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या आवाजातील हरिपाठाने अनेक भाविकांच्या दिवसाची सुरुवात होते, तो रोज का म्हणावा ते जाणून घ्या!

२६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ निरूपणार ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांना देवाज्ञा झाली. लौकिक रूपाने ते आता आपल्यात नसतील, तरी त्यांची कीर्तन प्रवचन इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय त्यांनी जनमानसात पेरलेले विचार लोकांच्या मनात कायमस्वरूपी रुजले आहेत. आजही अनेक घरात दिवसाची सुरुवात बाबामहाराजांच्या सुस्वरात म्हटलेला हरिपाठ ऐकूनच होते. काय आहे हरिपाठाचे एवढे महत्त्व, तो रोज का म्हटला पाहिजे, त्यामुळे होणारे लाभ कोणकोणते ते सविस्तर जाणून घेऊ. 

हरिपाठ म्हणजे काय?

हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण! संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठ रचला. २८ अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माउली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते, हे गूढ ज्ञान गुरु निवृत्ती नाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे. 

हरिपाठ केल्याने मिळते जपमाळ ओढल्याचे पुण्य 

'देवाचिये द्वारी' या पहिल्या अभंगापासून ते 'विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान या नवव्या अभंगापर्यंत १४ वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे 'त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी' या अभंगापासून हरिवंशपुराण, हरिनाम संकीर्तन या अभंगापासून २५ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. 'वेदशास्त्र प्रमाण' या अभंगापासून 'ज्ञानदेव प्रमाण' या अभंगापर्यंत १६ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजे एकूण ५४ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसेच दर अभंगानंतर 'हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा' या गजरात परत ५४ वेळा हरी नामाचा उच्चार होतो. अशाप्रकारे माउली आपल्याकडून नकळत १०८ वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतात, हरिपाठ म्हणतात त्यांना एक जपमाळ ओढल्याचे पुण्य लाभते. 

वारकरी समुदाय हरिपाठातला २८ वा अभंग म्हणत नाहीत कारण... 

हरिपाठातील २८ वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले २७ अभंग म्हणतात. २७ अभंग झाले की 'नाम संकीर्तन साधन पै सोपे' हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात. माउलींनी जो २८ वा अभंग लिहिलाय त्यात म्हटलं आहे की, 'जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरुकृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल.' 

आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे?

असावे स्वस्थचित्त एकाग्रे मन, उल्हासी करून स्मरण जीवी अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य 

यात माउली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतो ते सांगतात. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळू हळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते. अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो. संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत दसेना, संत सावता माळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत देव धावून गेला, तसा आपल्याही मदतीला येईल. त्यासाठी आपलाही पुण्यसंचय हवा. देव व्यवहारी जगातून आपल्याला ठरतो, शिवाय मृत्यूसमयी हरिनामाचा आठव होतो आणि विषयांचा संग सुटून मोक्ष प्राप्ती होते. 

संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंद मती केवितरे श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव।।

या नामाची प्रतीची आजवर अनेक संतांनी घेतली आहे. म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्याला या भवतापातून नक्की सोडवेल.