शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

वयाची चाळीशी ओलांडलीत? सावधान! आता 'ही' पथ्य पाळा; सांगताहेत तरुण सागर महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 2:36 PM

काही गोष्टी योग्य वयात केल्या तर भविष्यात पश्चात्ताप करावा लागत नाही; चाळीशी नंतरच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचे हे शिकवले जाते. त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचे ओझे वाहत असतो. मात्र योग्य वेळी हे ओझे उतरवून ठेवायलासुद्धा शिकले पाहिजे. हे ज्ञान आपल्याला संत, महंत आणि अध्यात्मिक गुरूंकडून मिळते. तरुण सागर महाराज हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. 

सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराज यांची ओळख होती. 'कडवे प्रवचन' ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध आहे. आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल त्यांनी मांडलेले विचार अनुकरणीय होते. अशातच त्यांनी चाळीशी ओलांडलेल्या तसे त्यापेक्षा मोठ्या आणि छोट्या वयाच्या लोकांना संदेश दिला आहे-

  • दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट सोडून चालणे सोडा. 
  • विसाव्या वर्षी खेळण्यांसाठी भांडणे सोडा. 
  • तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणे सोडा. 
  • चाळीसाव्या वर्षी रात्रीचे जेवण सोडा. 
  • पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे सोडा. 
  • साठाव्या वर्षी व्यवसाय तसेच नोकरी सोडा. 
  • सत्तराव्या वर्षी पलंगावर झोपणे सोडा. 
  • ऐंशीव्या वर्षी तामसी भोजन सोडा. 
  • नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा. 
  • शंभराव्या वर्षी हे जग सोडा. 

साधू मुनी कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसे जगू शकतात, याचे गुपितच जणू काही तरुण सागर महाराजांनी आपल्याला वरील संदेशातून सांगितले आहे. त्यावर नीट विचार केला असता लक्षात येईल, की आपण आता वयाच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर आपल्याला कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि निस्पृहतेचा मार्ग धुंडाळायला शिकायचे आहे. एखाद्या गोष्टीचा मोह सोडणे सोपे नाही, परंतु मोहाचा क्षण सोडला तर मोक्षही दूर नाही! 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स