शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पुत्रप्राप्तीच्या आशेने पूर्वीचे लोक पुत्रदा एकादशीचे व्रत करत असत...!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 22, 2021 17:30 IST

एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी. या उपासनेचे फळ मिळो न मिळो, परंतु भगवंताच्या चरणी आपली सेवा रुजू होते, म्हणून अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी करतात.

पौष शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. रविवारी २४ जानेवारी रोजी ही एकादशी आहे. वर्षभरातील इतर इतर एकादशीप्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे. यादिवशी व्रत कर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी, असे म्हटले जाते. 

पुत्रदा एकादशीची कथा :फार पूर्वी भद्रावती नामक नगरीचा राजा वसुकेत हा निपुत्रिक होता. पोटी संतान नसल्यामुळे त्या दाम्पत्याला राज्य, ऐश्वर्य, सुखदायक जीवन, सारे नीरर्थक, निरस वाटू लागले. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने राजा एका अरण्यात गेला. तिथे एका ऋषींचा आश्रम होता. राजाने ऋषींना आपल्या मनीची व्यथा सांगितली. त्यावेळी या समस्येवर उपाय म्हणून ऋषींनी त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. त्यानुसार राजाने अतिशय श्रद्धापूर्वक हे व्रत केले. यथावकाश त्याला पुत्रप्राप्ती झाली, असा या कथेचा सारांश आहे. 

पूर्वी पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीच्या आशेने केले जात असे. परंतु, आधुनिक काळात संतानप्राप्तीसाठी विज्ञानाने इतके मार्ग शोधून काढले आहेत, की त्यासाठी असे एखादे व्रत करावे, हे लोकांच्या ध्यानातही नाही. यापुढे जाऊन संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात,

नवसे पुत्र होती, तरि का करावा लागे पती।

इथे तुकडोजी महाराजांनी लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या बुवा, बाबांवर टिका करत वरील उद्गार काढले आहेत. संतानसुखासाठी आसुसलेले लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील भेद विसरतात. अशा लोकांना तुकडोजी महाराज रोखठोक सवाल करतात, नवसाने पूत्र होत असेल, तर नवऱ्याची गरज काय? स्वतःची सद्सदविवेक बुद्धी वापरा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. 

एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी. म्हणून अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी करतात. या उपासनेचे फळ मिळो न मिळो, परंतु भगवंताच्या चरणी आपली सेवा रुजू होते. हा भाव मनी ठेवावा. म्हणून, सदर एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले नाही, तरी त्यानिमित्ताने ईशसेवा घडावी आणि कृपादृष्टी लाभावी, या साध्या हेतूने एकादशी करता येईल.