शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

पितृपक्ष: पितरांना मोक्ष देणारे इंदिरा एकादशी व्रत, ‘असे’ करा पूजन; पाहा, मान्यता, व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:29 PM

Pitru Paksha Indira Ekadashi Vrat 2023: पितृपक्ष एकादशीला काही नियम आवर्जुन पाळावे, असे सांगितले जाते. नेमके काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या...

Pitru Paksha Indira Ekadashi Vrat 2023:पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षातील प्रत्येक तिथीला पितर, पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध केले जाते. पितृपक्षातील एकादशी महत्त्वाची मानली जाते. भाद्रपद वद्य एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते. यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. पितृपक्ष एकादशीचे महत्त्व, मान्यता, तिथी आणि व्रतकथा जाणून घ्या...

इंदिरा एकादशीचे व्रत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते. भाद्रपद वद्य एकादशीला हे व्रत आचरावे. यंदा मंगळवार, १० ऑक्टोबर २०२३ रोजी इंदिरा एकादशी आहे. आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा, यासाठी हे व्रत केले जाते, अशी मान्यता आहे. महाभारतात या एकादशीला उल्लेख आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्याच्या महत्त्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते, अशी मान्यता आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते.

इंदिरा एकादशीचे व्रतपूजन कसे करावे?

इंदिरा एकादशी व्रताच्या पूजन विधीबाबत पद्म पुराणात उल्लेख आढळतो. हे व्रत मनापासून आचरावे, असे सांगितले जाते. इंदिरा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून नित्यकर्मे उरकून घ्यावीत. इंदिरा एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. पूर्वजांचे स्मरण करून श्रीविष्णूंचे आवाहन करावे. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर गंगाजल, फुले, गंध, अक्षता अर्पण करावे. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात याचा प्रामुख्याने वापर करावा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करावा. श्रीविष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी. 

व्रताचरण करताना काय नियम पाळावेत?

इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. या व्रताचरण काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

इंदिरा एकादशीची व्रतकथा

एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरकयातना भोगत आहेत. त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे, असे पाहिले. या नरकयातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा, असे वडिलांनी स्वप्नात सांगितले. राजा इंद्रसेन विचारात पडला. यासंदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरण्याविषयी सांगितले. या व्रताचे जे पुण्य मिळेल, ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे, असे नमूद केले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले. या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरकलोकातून थेट वैंकुठात गेले, अशी कथा पुराणात सांगितली जाते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष