शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Ram Navami 2024: रामायणावर विपुल साहित्य उपलब्ध असल्याने नेमके कोणते रामायण वाचायला हवे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 3:33 PM

Ram Navami 2024: रामायणाला अवीट गोडी आहे, अनेक भाषांमध्ये ते उपलब्ध आहे, पण कळायला सोपं आणि शास्त्राधार असलेले रामायण कोणते ते पाहू. 

>> सर्वेश फडणवीस 

जेव्हा आपण म्हणतो की "या गोष्टीत काही 'राम' नाही" तेव्हा 'राम' हा शब्द 'तथ्य' शब्दाचा पर्याय झालेला असतो. 'रामबाण उपाय' हा वाक्प्रयोग मराठीतही आहे, हिन्दीतही आहे आणि बहुधा सर्वच भारतीय भाषात तो आढळतो. 'रामबाण' हे मुळात एक सामासिक नाम ! पण ते विशेषण बनून येतं आणि 'अचूक, अमोघ' हा अर्थ दर्शवितं. प्रात:काळचा शुद्ध, मंगल प्रहर आपल्या भाषेत 'रामप्रहर' होऊन उगवतो. हिन्दीत तर मिठाला 'रामरस' म्हणतात. किती समर्पक ! चिमूटभर मिठावाचून जसं ताटभर भोजन बेचव, तसंच सूक्ष्म रामतत्त्वावाचून दीर्घ जीवनही निरर्थक! इथे 'राम' शब्द रसवत्तेचं अधिष्ठान आहे. - भेटल्यावर 'नमस्ते' म्हणणं ही आधुनिक पद्धत. (आता तर good morning - good evening मुळे तीही लोपत चालली आहे!) पण खेड्यात अजूनही 'रामराम' म्हटलं जातं. दोन हिन्दीभाषी भेटले की 'जै (जय) रामजी की' हे शब्द उत्स्फूर्ततेनं निघतात. नमस्ते नमः ते = तुला नमस्कार) पेक्षा 'जय रामजी की'ची खुमारी काही वेगळीच ! ते नमन असतं अन्तर्यामी वसणाऱ्या 'आत्मा' रामाला ! म्हणजे अवघ्या जीवनातली सार्थकता ('राम' असणे) अचूकपणा (रामबाण), विशुद्धता (रामप्रहर), रसवत्ता (रामरस) आणि सर्वव्यापित्व (रामराम) ह्या सर्व भावना व्यक्तविण्याचं सामर्थ्य 'राम' ह्या एकाच शब्दात आहे! जीवनातला परमोच्च आदर्श म्हणजे राम!

प्रभु रामाचं चरित्र अनेकांनी गायिलेलं आहे. मराठीत भावार्थरामायण आहे, रामविजय आहे, हिन्दीत रामचरितमानस आहे, बंगालीत कृत्तिवास-रामायण, गुजरातीत गिरधरकृत रामायण, तेलुगु भाषेत रंगनाथ रामायण, उडियामध्ये कवि बलराम दाश यांनी रचलेले जगमोहन रामायण तर तमिळमध्ये कंबरामायण ! रामाची कथा प्रत्येक भाषेला 'आपली' वाटली,आणि प्रत्येक कवीनं आपापल्या कल्पनेनुसार त्यात अनेक उपकथानकं जोडून ती कथा अधिकाधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला! पण त्यामुळे एक गोंधळ झाला! स्थल-कालांच्या संदर्भात फरक दिसू लागला. कोणत्या रामकथेला खरं मानावं? उत्तर एकच ! रामाचा समकालीन असणाऱ्या महर्षि वाल्मीकींच्या लेखणीतून अवतरलेली मूळ रामकथाच प्रमाण मानायची !

मूळ वाल्मीकिरामायण, पं. सातवळेकरांचं भाष्य, वं. मावशींची (केळकर) प्रवचनं, श्रद्धेय गुरुचरण स्वामी गोविंददेवगिरि यांची प्रवचनं, या सर्वांतून मी 'राम' शोधत गेले. त्यातून मला जे आणि जितकं उमगलं, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात आहे. तटस्थ दृष्टीनं विचार केला तर राम हा एक क्षत्रिय राजकुमार. श्रीरामानं स्वतः कधीच म्हटलं नाही की मी ईश्वराचा अवतार आहे. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' हे त्याचं प्रांजळ वचन वाल्मीकीनं नोंदवलं आहे.

व्यक्तीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे हा विवेक श्रीरामाला क्षणभरही सोडून गेला नाही. त्यामुळेच तो नराचा नारायण झाला. प्रत्येकाच्या मुखी येऊ लागलं की,माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ॥प्रभु राम हा आदर्शाचा, मांगल्याचा, अचूकतेचा नि रसवत्तेचा पर्याय बनला, आणि सुजनांच्या मनात दाटून आलं की 'प्रभाते मनी राम चिन्तीत जावा'.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण