शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:25 IST

Ram Navami 2025: शाळिग्रामाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे आणि त्याच्या पूजेच्या अनेक अटी व नियम आहेत, तरी मूर्तीसाठी शाळिग्राम निवडण्याचे कारण जाणून घेऊ.

>> योगेश काटे, नांदेड 

रामललाची मूर्ति शालिग्रामातून साकारण्यात आली. शालिग्राम हे श्रीविष्णुंचे प्रतिकात्मक रूप मानले जाते. अशा पवित्र शाळिग्रामची माहीती जाणून घेऊया. 

शाळिग्राम : 

शाळिग्रामात  लक्ष्मीसमेत श्री विष्णूचे नित्य सानिध्य असते. शाळिग्रामाची नित्यपुजन व तुलसीअर्चन आणि नैवद्य करणे हा शास्त्राचा दंडक. तुळशी शिवाय शालिग्रामची पुजाच करू नये एकवेळस फुल नसले तरी चालेल मात्र तुळस आवश्यक आहे. तुळशिवाय शाळिग्रामची पुजा केल्याने दारिद्रय येते असा  गुरुचरित्रात उल्लेख मिळतो.  श्री नरसिंह सरस्वती  यांच्या नित्य पुजनात शाळिग्राम होते.

शाळिग्राम  पुजाचा आचार सोवळ्यातच आहे. पद्मपुराणात शालिग्रामची कथा आहे. तसेच वृंदा जालंदर व विष्णुची कथा आहे. भविष्योत्तरपुराणात शाळिग्राम नामक एक स्तोत्र आहे  धर्मराज युधिष्ठिर व भगवान श्रीकृष्णाचा हा संवाद यात विविध शाळिग्रामाची वर्णनने आहेत तसेच दशावताराचे वर्णन मिळेल. खुप सुंदर असे स्तोत्र आहे. 

Ram Navami 2025: राम आणि रावणात मुख्य फरक काय होता? सांगताहेत कुमार विश्वास!

पंचायतन पुजा विशेषतः मध्व संप्रदायात  शाळिग्रामाचे महत्तव अधिक. शाळिग्रामावरील मुखे व चक्रे यांवरून त्याची परीक्षा करतात. शाळिग्रामाचे  एकुण ८९ प्रकार असून रंगावरून  पुढील नावे दिली आहेत : 

शुभ्र पांढरा –वासुदेव, निळा–हिरण्यगर्भ, काळा –विष्णू, गडद हिरवा–श्रीनारायण,तांबडा –प्रद्युम्न गडद निळा – नरसिंह किंवा वामन. 

शाळीग्राम एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे, जो देवाचा प्रतिनिधी म्हणून देवाला आवाहन करण्यासाठी वापरला जातो.शालिग्राम सहसा पवित्र नदीच्या काठावरुन किंवा काठावरुन गोळा केला जातो. शिवभक्त पूजा करण्यासाठी शिवलिंगाच्या रूपात जवळजवळ गोलाकार किंवा अंडाकृती शालिग्राम वापरतात. वैष्णव (हिंदू) विष्णूचा प्रतिनिधी म्हणून पवित्र गंडकी नदीत सापडलेल्या गोलाकार शिळेला शाळीग्राम म्हणतात. शालिग्राम हे विष्णूचे एक नाव आहे.

पद्मपुराणानुसार - गंडकी अर्थात नारायणी नदीच्या प्रदेशात शालिग्राम स्थळ नावाचे एक महत्त्वाचे स्थान आहे; तिथून बाहेर पडणाऱ्या दगडाला शाळीग्राम म्हणतात. शालिग्राम शिळेच्या नुसत्या स्पर्शाने करोडो जन्मांची पापे नष्ट होतात, असे म्हणतात. 

बारा चक्रे असलेल्या शाळिग्रामाला अनंत म्हणतात. शाळिग्रामाच्यातीर्थाचे फार महत्व आहे. शाळिग्राम स्तोत्रातील हा श्लोक फार प्रसिद्ध . 

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् ।विष्णोः पादोदकं पीत्वा शिरसा धारयाम्यहम् ।। 

नित्य श्रीहरीचे सानिध्य शाळिग्राम शिलेत वास करतो अशी आपल्या धर्मशास्त्राची व सश्रद्ध व धार्मिक हिंदुंची धारणा आहे. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर