शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

Rath Saptami 2025: रथसप्तमीपूर्वी वास्तु शास्त्रानुसार बदल करा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:02 IST

Rath Saptami 2025: यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, तत्पूर्वी लेखात सुचवलेले बदल केले असता वास्तुमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील.

१४ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेला मकरोत्सव यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमीच्या (Rath Saptami 2025) मुहूर्तावर पूर्ण होणार आहे. हा काळ संक्रमणाचा तसेच सकारात्मक ऊर्जा देणारा समजला जातो. या काळात केलेले चांगले बदल आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठीच वास्तु शास्त्रात सूर्याशी संबंधित दिलेले बदल जाणून घ्या. 

वास्तू उभारताना पूर्व दिशा पाहिली जाते. जेणेकरून वास्तूमध्ये पुरेपूर सूर्यप्रकाश व्यापून राहावा. जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून आनंद आणि शांतता नांदते. यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार घरातील कोणत्या खोलीची जागा कुठे असावी हे जाणून घ्या!

वास्तुशास्त्राच्या पुढील नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये बदल केले, तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला काही काळातच दिसून येईल. घरातील आर्थिक, मानसिक, शारीरिक परिस्थितीतही बदल घडताना दिसतील. त्यासाठी या किरकोळ बदलांनी सुरुवात करा. 

>> सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे पहाटे ३-६ हा ब्रह्म मुहूर्त. यावेळी सूर्य घराच्या उत्तर-पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजागृह बनवावे.

>> सकाळी ६-९ या वेळेत सूर्य घराच्या पूर्व दिशेलाच असतो, त्यामुळे त्या दिशेने घरात सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करा. त्या दिशेला खिडकी असणे उत्तम, मात्र त्याच्या समोर काही वस्तू ठेवून सूर्यप्रकाशाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवू नका. मोकळी हवा, सूर्यप्रकाश घरात खेळू द्या. त्यामुळे आजार पसरवणारे सूक्ष्म जीव नाहीसे होऊन कुटुंब स्वास्थ्य जपले जाईल. 

>> सकाळी ९-१२ पर्यंत सूर्य घराच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाकासाठी योग्य आहे. ज्याप्रमाणे पोटाती>> ल अग्नी प्रज्वलित झाल्यावर आपण जेवतो, तसे स्वयंपाक बनवतानाही सूर्यप्रकाशाच्या उजेडात बनवलेला स्वयंपाक आरोग्यासाठी पोषक ठरेल आणि तो बनवताना गृहिणीलाही प्रसन्न वाटेल. 

>> दुपारी १२-३ ही आपल्या विश्रांतीची वेळ असते. अशा वेळी सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि त्यावेळेस सूर्याची प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतात, त्यामुळे विश्रांती दरम्यान खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून ती किरणं घरात येण्यापासून आळा घालावा. 

>> अभ्यास व कामाची वेळ दुपारी ३-६ अशी असून त्यावेळेस सूर्य नैऋत्य भागात असतो. त्यामुळे स्टडी रूम किंवा लायब्ररीसाठी ही दिशा उत्तम ठरते. 

>> सूर्यास्ताची वेळ न्याहारी किंवा काही जणांसाठी जेवणाची वेळ असते. सूर्यास्ताचा प्रकाश, वेळ थोडी हुरहूर लावणारी असल्याने ती वेळ टाळून किंवा त्याच्या पूर्वी आहार घेणे सोयीचे ठरते. पश्चिम दिशेला तुमच्या घराची खिडकी येत असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मंद संगीत आणि चहाचा आस्वाद घेऊ शकता, फक्त पदार्थाचे सेवन टाळा. सूर्यास्तामुळे आजार पसरवणाऱ्या कीटकांचे प्राबल्य वाढते. म्हणून पूर्वी ७ च्या आत रात्रीचे जेवण उरकले जात असे. 

>> झोपेच्या वेळी सूर्य अनुपस्थित असतो, परंतु सकाळ सूर्याच्या किरणांनी होणार असल्यामुळे बेडरूमची दिशा पश्चिमेला असेल तर सूर्यकिरणे थेट बेडरूममध्ये शिरकाव करतील आणि आपली मॉर्निंग आपोआप गुड होईल. 

>> घरातील मौल्यवान वस्तू, पैसे ठेवण्याची जागा अर्थात तिजोरी गुप्त राहावी या हेतूने कपाटाची दिशा उत्तरेला ठेवा. 

वास्तूमध्ये केलेले हे किरकोळ बदल तुम्हाला नवीन ऊर्जा देतील हे नक्की!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रMakar Sankrantiमकर संक्रांती