शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने कोणते फळ मिळते, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 10:11 IST

कृतवीर्याप्रमाणे आपल्याही मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्यालाही सद्गती प्राप्त होवो, यासाठी आपणही संकष्ट चतुर्थीचे व्रत अंगिकारूया. 

संकट दूर करणाऱ्या बाप्पाच्या आवडत्या संकष्ट चतुर्थीबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी... 

साम नावाचा एक दुष्ट असुर होता. तो वाटमारी करून वर शिवाय त्या लोकांना ठार मारीत असे. एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता. पण त्या दिवशी त्याला वाटमारीसाठी कुणीच भेटले नाही. त्यामुळे त्याला उपास घडला. रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला. त्याने आपला मुलगा गणेश याला हाक मारली. परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही. म्हणून तो दारापाशी थांबून अविरत गणेश, गणेश, गणेश अशा हाका मारू लागला. खूप वेळाने त्याची हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले. सामाच्या बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. मग त्यांनी एकत्र भोजन केले. 

या दिवशी गणपतीची आवडती चतुर्थी तिथी होती. सामाकडून त्या दिवशी नकळत गणेशाचा जप घडला आणि कामाच्या शोधात दिवसभर उपास घडला. चंद्रोदयानंतर भोजन झाले. याचा एकत्रित परिणाम असा झाला, की सामाच्या ठायी पुण्याचा संचय झाला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. 

परंतु संपूर्ण आयुष्यात आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झाली, याचे दु:खं त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले. ते पापक्षालन व्हावे अशी त्याची इच्छा होती. म्हणून देवांनी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले. कृतवीर्य नावाने तो पृथ्वीवर परत आला. त्याचा विवाह झाला. पण पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्याच्या मनाला शांतता नव्हती. चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात, हे तो जाणून होता. म्हणून तो मनोभावे गणपतीची आराधना करू लागला. त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे कुटुंब-घरदार सुखी झाले. ही हकीकत अन्य गणपती भक्तांना कळले आणि तेव्हापासून तेदेखील संकष्ट चतुर्थीचे व्रत करू लागले.

कृतवीर्याप्रमाणे आपल्याही मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्यालाही सद्गती प्राप्त होवो, यासाठी आपणही संकष्ट चतुर्थीचे व्रत अंगिकारूया.