शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
2
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
3
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
4
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
5
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
6
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
7
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 
8
“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला
9
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...
10
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
11
Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे
12
OTTनंतर जुनैद खान झळकणार रुपेरी पडद्यावर, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस
13
स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर
14
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
15
NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ
16
छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या; म्हणाल्या, "दीपिका, आलियासारखं..."
17
"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण
18
Ola Electric share: ₹१६० पर्यंत जाऊ शकतो 'या' इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या
19
"जिच्या वडिलांनी अफजल गुरूला वाचवण्याचा प्रयत्नन केला, अशा महिलेला..."; मालीवाल यांचा केजरीवालांवर निशाणा
20
Women’s T20 World Cup: महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं तब्बल १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम

मारुती रायाचा 'हा' श्लोक तोंडपाठ करून टाका आणि नैराश्य, भीतीला कायमचा रामराम म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 7:00 AM

स्तोत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते, जर मोठे स्तोत्र पाठ नसेल तर सुरुवात या दोन ओळींनी नक्कीच करता येईल!

शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठायी होता, म्हणून सकल संतांनी एकमुखाने त्याला भक्तश्रेष्ठ ही उपाधी दिली. कारण, ही उपाधी मिळूनही त्याच्याठायी अहंकाराचा लवलेश नव्हता, तर सदैव विनम्र भाव होता. या हनुमंताचे वर्णन करणारी अनेक स्तोत्र आपल्या परिचयाची आहेत. तरीदेखील दोन ओळीत त्याचे वर्णन करायचे झाले, तर समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्रातील श्लोकाचा आधार घेता येईल. 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।

मनाचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त आहे. ते घटकेत गल्ली ते दिल्ली एवढा वेगाने प्रवास करू शकते. अशा वेगवान मनावर ज्याने ताबा मिळवला. इंद्रियांना नियंत्रणात ठेवून जो जितेंद्र झाला. विद्वतचर्चेत भाग घेऊन ज्याने नम्रपणे आपले बुद्धिचातुर्य दाखवले. जो वानर सेनेचा नायक झाला आणि ज्याच्या ठायी प्रचंड सामर्थ्य असूनही ज्याने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले त्या हनुमंताला आम्ही शरण जातो. 

आजच्या काळात सगळ्यात जास्त गरज आहे ती मन नियंत्रणात ठेवण्याची. मन चंचल असते ही बाब जरी खरी असली, तरी त्यावर योग्य वेळी नियंत्रण ठेवलेच पाहिजे अन्यथा मन वाहवत जाते आणि त्याचे परिणाम देहाला भोगावे लागू शकतात. यासाठीच मारुती रायाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणूनच हा श्लोक रोज अकरा वेळा म्हणावा. जेणेकरून त्या श्लोकाचा अर्थ उमजला तर मनाला उभारी येईल आणि इंद्रियांवर नियमन ठेवता येईल. 

या श्लोकातून बालमनावर योग्य संस्कार घालता येतात. हनुमंताचे चरित्र आजच्या तरुणांसाठी अतिशय आदर्श चरित्र आहे. मैत्री, प्रेम, भक्ती, दास्यत्व अशा सर्व बाबतीत त्याला तोड नाही. राम नाम घेत कमावलेले शरीर आणि जीवनाला दिलेली योग्य दिशा आपणही आचरणात आणण्यासारखी आहे. म्हणून केवळ भक्ती नाही, तर युक्ती आणि शक्तीचाही आदर्श घेऊन हनुमंताचे अनुकरण आपण केले पाहिजे. 

रामरक्षा पाठोपाठ मारुती स्तोत्र म्हणण्याची सवय आपल्याला बालपणापासूनच आहे. काही कारणाने ती सवय मोडली असेल, तरी हरकत नाही. रोज दहा मिनिटे इंटरनेटवर स्तोत्र लावून त्याबरोबर आपणही म्हणण्याचा सराव केला, तर कोणत्याही वयात ही स्तोत्र सहज पाठ होतील आणि जिभेला चांगले वळण लागेल. 

स्तोत्रपठणाला जोड द्या व्यायामाची. मारुती रायाने व्यायाम करून शरीर कमवले, मरगळ झटकली आणि राम कार्याला आयुष्य समर्पित केले. त्याचप्रमाणे आपणही आळस, अज्ञान झटकून उत्साहाने व्यायाम करूया, प्राणयाम करूया, मन, बुद्धी आणि शरीर शक्तिशाली बनवूया, ज्यामुळे भीती नैराश्य आपल्या आसपासही फिरकणार नाही!