शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
5
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
6
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
7
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
8
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
9
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
10
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
11
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
12
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
13
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
14
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
15
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
16
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
17
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
18
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
19
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
20
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले

Religious Rules: शास्त्रानुसार केस असो वा नखं ती दिवसाच कापावी, सायंकाळी नाही; जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 4:20 PM

Religious Rules: मोठ्यांच्या सांगण्यानुसार काही गोष्टी आपण नियम म्हणून किंवा शास्त्र म्हणून पाळतो, त्यामागील कारण जाणून घेण्याची जिज्ञासा दाखवली पाहिजे!

हिंदू धर्मात अनेक रूढी-प्रथा पिढीदर पिढी पाळल्या जातात. कालपरत्वे काही नियम शिथिल होतात तर काही नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्याच नियमांपैकी एक नियम म्हणजे सूर्यास्तानंतर केस आणि नखं कापू नयेत. पण का? ते जाणून घेऊ. 

बालपणी आपल्याला छोट्या मोठ्या सवयींची शिस्त लावण्याचे खाते विशेषतः आई नाहीतर आजीकडे असे. सोमवारी, शनिवारी केस धुवू नये, सायंकाळी केर काढू नये, तेल मीठ सायंकाळी विकत आणू नये, सूर्यास्तानंतर कोणाला पैसे देऊ नये. अशा अनेक नियमांचे आपण जमेल तसे, जमेल तेव्हा पालन करतो. यापैकीच एक सवय म्हणजे सायंकाळनंतर नखं आणि केस कापू नये. 

काय आहे त्यामागचे कारण? जाणून घेऊ. 

सांयकाळी दिवेलागणीची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते. तिच्या स्वागतासाठी आपण संध्याकाळ होण्याआधी घर आवरतो, केर काढून स्वच्छ करतो. अशा वेळी कापलेली नखं घरात टाकणे किंवा संध्याकाळी केस कापायला जाणे हा लक्ष्मी मातेचा अपमान समजला जातो. तिची नाराजी ओढवली जाऊ नये म्हणून सायंकाळी या गोष्टी करू नयेत असे त्यामागचे धार्मिक कारण आहे. तर शास्त्रीय दृष्ट्या तसे करणे अयोग्य का, तेही पाहू. 

शास्त्रीय कारण : 

रात्री केस आणि नखे न कापण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पूर्वी दिव्याच्या अल्प प्रकाशात जमिनीवर पडलेली नखं, गुंतूळ, कापलेले केस दिसत नसत. भारतीय बैठकीनुसार जेवायला खाली बसताना ते जेवणात येऊ नये, त्यामुळे रोगराई पसरू नये, त्यामुळे सायंकाळी या गोष्टी टाळल्या जात असत. मग तुम्ही म्हणाल, आता तर घराघरात सायंकाळीसुद्धा भरपूर प्रकाश असतो, मग आता हा नियम मोडल्यास काय हरकत आहे? तर प्रश्न पुन्हा स्वच्छतेचा आहे. केस किंवा नखं कापल्यानंतर स्वच्छ अंघोळ करणे महत्त्वाचे असते. सायंकाळी केस किंवा नखं कापल्यावर अंघोळीचा कंटाळा केला तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यापेक्षा या दोन्ही गोष्टी सकाळच्या वेळी करणे इष्ट ठरते!