शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सध्या 'या' चार राशींचे नशीब सूर्यासारखे झळकत आहे, मोठा लाभ होण्याचीही शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:18 IST

त्यात तुमचीही रास असेल तर आनंदच आहे, पण जर नसेल, तर विश्वास ठेवा, तुमचेही लखाकण्याचे दिवस नक्की येतील. 

प्रत्येक दिवस काही ना काही चांगले वाईट घेऊन येत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो, यावर त्या परिस्थितीचा निकाल लागतो. यासाठी आपली मनस्थिती, परिस्थिती आणि ग्रहस्थिती अनुकूल असावी लागते. ती ठीक असेल तर वाईटात वाईट परिस्थितीदेखील सहज निभावली जाते. आपली परिस्थिती आणि मनस्थिती बहुतांश ग्रहस्थितीवर देखील अवलंबून असते. त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि परिणामी आपल्या वागण्या बोलण्यावर देखील पडत असतो. त्यामुळे आजचा दिवस ठीक ठाक गेला किंवा वाईट गेला, तरी वाईट वाटून घेऊ नका. रोजचा दिवस नवीन संधी घेऊन येत असतो. 

आता या चार राशीच बघा ना... वृषभ संक्रांतीला सूर्य स्थिती बदलल्यापासून या चार राशी लखलखत आहेत. त्यांच्याबाबत भविष्यात मोठे लाभ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या चार राशी कोणत्या ते पहा. त्यात तुमचीही रास असेल तर आनंदच आहे, पण जर नसेल, तर विश्वास ठेवा, तुमचेही लखाकण्याचे दिवस नक्की येतील. 

या चार राशी पुढीलप्रमाणे आहेत -

वृषभ : सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश हा त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यांना कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. संपत्तीत वाढ होईल आणि व्यवसायात नफा होईल. वाहन खरेदीचा योग येईल. आरोग्य चांगले राहील.

सिंह: सिंह राशीच्या वाट्याला नेहमी खडतर आयुष्य आणि कठीण प्रसंग येतात. परंतु अलीकडेच झालेल्या सूर्याच्या संक्रमणामुळे त्यांना सध्या अतिशय अनुकूल दिवस आले आहेत. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठीही हा काळ चांगला आहे. आरोग्याशी संबंधित अडचणी दूर होतील. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. नवीन काही शिकण्यास प्रारंभ होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

धनु : धनु राशीचे नशीब सध्या जोरात आहे. ही रास आपले काम करवून घेण्यात पटाईत असते. त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. त्याचाच फायदा त्यांना या काळात होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या क्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक होईल. नोकरीतील बदलांसाठी ही योग्य वेळ आहे. 

मीन : मीन राशीचे लोक नेहमी तळमळत असतात. सुखापर्यंत पोहोचता पोहोचता सुख त्यांना हुलकावणी देते. त्यामुळे त्यांची अवस्था पाण्यातून बाहेर निघालेल्या माशाप्रमाणे होते. परंतु, सध्याचा काळ असा आहे की खुद्द सूर्य देव तुमच्या राशीच्या बाजूने उभे असल्यामुळे सुख अलगद येऊन तुमच्या ओंजळीत पडणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेम विवाहासाठी किंवा वैवाहिक आयुष्यासाठी हा काळ सुखद असणार आहे.