शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 8:36 PM

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो.

कबीरांची भाषा रोखठोक आणि सडेतोड आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या काव्यावरून येईल.

जंगल जाकर काहेकू बैठे, सुनले बावा साधु,बैठे जागो सुखसे बैठो, मत होना भोंदु,रामनाम जपोरे, अंतर शुद्ध रखो रे,जनम मरनकी गठरी खोलो, संतपगसे रखो ध्यान,जटाजूट और आसन मुद्रा काहेकू झुटा ग्यान,तीरथ बरत जोग काके शीर मुंडाके बैठा है,चुप कहासे घुसाघुसी आगे शिरपर सोटा है,निशिदिनी धुनी राम नामकी लगादे अपने मनमो,कहत कबीर सुनो भाई साधु नही तो, फत्तर है जंगलमो।

अरण्यात जाऊन कशाला बसले पाहिजे? तू ज्या जागी बसला आहेस, तिथेच बस! जंगलात जाऊन बसण्याचे व्यर्थ ढोंग करू नकोस. रामनाम जप आणि मन शुद्ध ठेव. उगाचच दाढी आणि जटा वाढवू नकोस. संतांच्या चरणी विश्वास ठेव. जन्ममरणाची चिंता अकारण करत बसू नकोस. आसन, मुद्रा आणि योगशास्त्रातल्या गोष्टी बाजूला ठेव. खोटे ज्ञान काय कामाचे? योग्यासारखे भगवे कपडे अंगावर चढवले, तीर्थाला गेले आणि डोक्याचे मुंडन करून घेतले म्हणून मनातले खोटे विचार थोडेच दूर होणार आहेत?

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

रामनामाची मोठ्या आवाजात धून कशाला लावली पाहिजे? आपल्या मनात नाम नाही का घेता येणार? अरे, आपल्या मनात अखंड जप चालू ठेव. मनातील अविचारांचा अंधार दूर कर. ज्ञानाचा दिवा लाव. सद्विचारांच्या उदबत्तीचा सुगंध दाही दिशांत दरवळू दे. असे वागलास, मग आहेच तिथेच परमेश्वराचा खरा भक्त होशील. 

तू जंगलात जाऊन काय करणार आहेस? जंगलात काय दगड थोडे आहेत का? तू असे ढोंग करून जंगलात गेलास, तर त्या दगडात आणखी एकाची भर पडेल. दुसरे काय होणार? हाच विचार आणखी एका पदात ते मांडतात,

काहेकू जंगल जाता बच्चे, काहेकू जंगल जाता?घर बैठे रामही देको, अंदर भीतर भरपुर उजाला, भयो आपनेही सात।येही जनम सुखके कारक साधु संतसो मानो,जान जायगी क्या फल पाया, इतना कहना मानो।बडा कुवा आगे भया, काहेकू इसमें डुबता?जोरू लरके नाता पुती, आखर अकेला तू जाता।कहत कनीर सुनो भाई साधु, अखंड भजो तुम राम,भजन करो किसे ना डरो, जमका कछु न चले काम।

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो. आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही तरी तू काय मिळवणार आहेस? पुढे तर प्रचंड मोठी विहीर आहे. तुला त्या विहिरीत बुडून जायचे नाही ना? पत्नी, पुत्र, कन्या, सगळे नातेवाईक इथेच राहणार आणि तू एकटाच तुझ्या रस्त्याचे जाणार आहेस. म्हणून कबीर सांगतात, रामाचे नाव घे. कोणाची चिंता करू नकोस आणि निर्भयपणे रामनाम घे. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!