शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोक्ष मिळवणे आपल्या हाती आहे का? नक्कीच आहे; मोक्षाचा मार्ग कोणता, हे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:58 IST

ज्याने आयुष्यभर नि:स्वार्थपणे देवकार्य, देशकार्य, समाजकार्य केले. असे लोक आपल्या कृतीतून आपले आयुष्य सार्थकी लावतात. त्यांनाच मोक्षप्राप्ती होते.

मृत्युनंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी असे आपल्या सर्वांनाच वाटते. यालाच आपण मोक्ष किंवा मुक्ती मिळणे असे म्हणतो. दोन्ही शब्दांचे अर्थ सारखे वाटत असले, तरी त्यात मोठा फरक आहे. तो फरक कोणता, हे समजून घेऊया.

मुक्ती : व्यक्तीच्या मृत्यूपश्चात श्राद्धविधी केले जातात. या विधींमुळे आत्म्याला सद्गती मिळते अशी श्रद्धा आहे. श्रद्धेने केले जाते, म्हणून त्याला श्राद्ध म्हणतात. चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास पूर्ण करून आत्मा नरदेहात प्रवेश करतो. या चक्रात तो पुन्हा अडकू नये, म्हणून मृत्यूपश्चात तर्पण करून आत्म्याला सद्गती मिळावी अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. यालाच आत्म्याला मुक्ती मिळणे असे म्हणतात. 

मोक्ष : मोक्ष ही संकल्पना ऋषिमुनींकडून आपण ऐकत आलो आहोत. मोक्ष मिळण्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या करावी लागते. तेव्हाकुठे मृत्यूपश्चात जीव शिवाशी एकरूप होतो. ही भक्त भगवंताची एकरूपता म्हणजे मोक्ष! तो मिळणे अतिशय कठीण आहे. म्हणून आपण सामान्य लोक मुक्तीची अपेक्षा करू शकतो. मोक्षाची नाही! मोक्ष कोणाला मिळतो? ज्याने आयुष्यभर नि:स्वार्थपणे देवकार्य, देशकार्य, समाजकार्य केले. असे लोक आपल्या कृतीतून आपले आयुष्य सार्थकी लावतात. त्यांनाच मोक्षप्राप्ती होते. 

जर आपणही सत्कार्य केले, स्वत:बरोबर देव, देश, धर्माच्या उत्कर्षाचा विचार केला, कृती केली, तर आपल्याही मोक्ष नक्की मिळू शकेल. अन्यथा आपल्या नावाने कोणी ना कोणी मुक्तीची प्रार्थना करणारे असेलच...! मग आता मोक्ष मिळवायचा की मुक्ती, हे तुम्हीच ठरवा!