शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 20:16 IST

एका प्रसंगात समर्थ रामदास स्वामी यांनी देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात केलेले मार्गदर्शन आताच्या घडीलाही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. जाणून घेऊया...

रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. माघ कृष्ण नवमीला 'दासनवमी' असे म्हणतात. या दिवशी समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एका प्रसंगात समर्थ रामदास स्वामी यांनी देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात केलेले मार्गदर्शन आताच्या घडीलाही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. जाणून घेऊया...

पहाटेच्या समयी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करण्याचा रामदास स्वामींचा नित्यक्रम. नामस्मरणाला बसले की, स्वामींची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एके दिवशी न राहून एका शिष्याने समर्थांना विचारेल की, आपण देवाचे नामस्मरण करताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जरादेखील विचलित होत नाहीत? मनात आपण नेमका काय विचार करीत असता? मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही, हे कसे शक्य होते? असे काही प्रश्न एकामागून एक शिष्याने विचारले. 

कधी आहे महाशिवरात्री? पाहा, मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता

यावर समर्थ रामदास स्वामी शिष्याला म्हणाले की, एकदा एका राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल, इतकेही वस्त्र नव्हते. तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या. अनेक दिवसांपासून भिक्षुक जेवलेला नसेल, हे स्पष्टपणे दिसत होते. मात्र, भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. शारीरिक कष्ट सोसलेला तो भिक्षुक किमान उभा तरी कसा काय राहू शकत होता, याचे आश्चर्य पाहणाऱ्यांना वाटत होते. तो भिक्षुक केव्हाही खाली कोसळेल, अशा स्थितीत ताटकळत उभा असताना तेवढ्यात राजा बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की, सांग, तुला काय हवे आहे?

राजाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भिक्षुक म्हणाला की, आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर यावर मला काहीही बोलायचे नाही. मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल, याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे, असे भिक्षुकाने सांगितले. 

समोर घडलेला तो प्रसंग पाहून, देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल. याउपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल. तर माझे शब्द ती सांगायला कसे पूरे पडू शकतील? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत, तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पूरेसे असते, असे समर्थ रामदास स्वामी शिष्याला म्हणाले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक