शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
4
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
5
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
6
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
8
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
9
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
10
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
11
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
12
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
13
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
14
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
15
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
16
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
17
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
18
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
19
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
20
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई

मारुती रायाचा दोन ओळींचा 'हा' श्लोक रोज ११ वेळा म्हणा आणि यशस्वी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 3:17 PM

आजच्या काळात सगळ्यात जास्त गरज आहे ती मन नियंत्रणात ठेवण्याची. या श्लोकाचा अर्थ उमजला तर मनाला उभारी येईल आणि इंद्रियांवर नियमन ठेवता येईल. 

शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठायी होता, म्हणून सकल संतांनी एकमुखाने त्याला भक्तश्रेष्ठ ही उपाधी दिली. कारण, ही उपाधी मिळूनही त्याच्याठायी अहंकाराचा लवलेश नव्हता, तर सदैव विनम्र भाव होता. या हनुमंताचे वर्णन करणारी अनेक स्तोत्र आपल्या परिचयाची आहेत. तरीदेखील दोन ओळीत त्याचे वर्णन करायचे झाले, तर समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्रातील श्लोकाचा आधार घेता येईल. 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।

मनाचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त आहे. ते घटकेत गल्ली ते दिल्ली एवढा वेगाने प्रवास करू शकते. अशा वेगवान मनावर ज्याने ताबा मिळवला. इंद्रियांना नियंत्रणात ठेवून जो जितेंद्र झाला. विद्वतचर्चेत भाग घेऊन ज्याने नम्रपणे आपले बुद्धिचातुर्य दाखवले. जो वानर सेनेचा नायक झाला आणि ज्याच्या ठायी प्रचंड सामर्थ्य असूनही ज्याने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले त्या हनुमंताला आम्ही शरण जातो. 

आजच्या काळात सगळ्यात जास्त गरज आहे ती मन नियंत्रणात ठेवण्याची. मन चंचल असते ही बाब जरी खरी असली, तरी त्यावर योग्य वेळी नियंत्रण ठेवलेच पाहिजे अन्यथा मन वाहवत जाते आणि त्याचे परिणाम देहाला भोगावे लागू शकतात. यासाठीच मारुती रायाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणूनच हा श्लोक रोज अकरा वेळा म्हणावा. जेणेकरून त्या श्लोकाचा अर्थ उमजला तर मनाला उभारी येईल आणि इंद्रियांवर नियमन ठेवता येईल. 

या श्लोकातून बालमनावर योग्य संस्कार घालता येतात. हनुमंताचे चरित्र आजच्या तरुणांसाठी अतिशय आदर्श चरित्र आहे. मैत्री, प्रेम, भक्ती, दास्यत्व अशा सर्व बाबतीत त्याला तोड नाही. राम नाम घेत कमावलेले शरीर आणि जीवनाला दिलेली योग्य दिशा आपणही आचरणात आणण्यासारखी आहे. म्हणून केवळ भक्ती नाही, तर युक्ती आणि शक्तीचाही आदर्श घेऊन हनुमंताचे अनुकरण आपण केले पाहिजे. 

रामरक्षा पाठोपाठ मारुती स्तोत्र म्हणण्याची सवय आपल्याला बालपणापासूनच आहे. काही कारणाने ती सवय मोडली असेल, तरी हरकत नाही. रोज दहा मिनिटे इंटरनेटवर स्तोत्र लावून त्याबरोबर आपणही म्हणण्याचा सराव केला, तर कोणत्याही वयात ही स्तोत्र सहज पाठ होतील आणि जिभेला चांगले वळण लागेल.