शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

Shahid Diwas: २३ मार्च शहीद दिन: देवभक्ती इतकीच देशभक्तीही महत्त्वाची; वाचा या दिवसाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 9:00 AM

Shahid Diwas 2023: भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तीन क्रांतीकारक आजच्या दिवशी देशासाठी शहीद झाले, त्यांच्या नावे हा दिन! शिवाय... 

ईश्वरभक्त आपण असतोच, पण त्याबरोबरच आपण या समाजाचे, देशाचे देणे लागतो. त्यांच्याप्रती आपण आपली कर्तव्य पूर्ती करणे तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिहितात, ''देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो! हे लक्षात ठेवून केलेली समाजसेवा, देशसेवा म्हणजे खरी देशभक्ती!

असेच तीन देशभक्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, ऐन तारुण्यात आपल्या हसत हसत शहीद झाले. त्यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. हे बलिदान देऊन ते अमर झाले. 

माता आणि माती यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. मात्र आपण या दोन्हीच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. एक जन्म देते, तर दुसरी आपला सांभाळ करते. एकीच्या उदरात आपला जन्म झाला तर एकीत आपण मिसळणार आहोत. हे भान ठेवून या दोन्ही मातांची सेवा आपल्या आयुष्यात केलीच पाहिजे. क्रांतिकारकांनी प्रचंड लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले आता आपली जबाबदारी आहे ते ते टिकवून ठेवण्याची! त्यामुळे अशा क्रांतिकारकांच्या शहिद दिनानिमित्त त्यांचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांचा आदर्श ठेवून आपणही धर्मकार्यात, देवकार्यात तसेच देशकार्यात आपले सक्रिय योगदान दिले पाहिजे!

जय हिंद!