शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

Shravan 2022: श्रावण महिना केवळ सण उत्सवाचा नाही, तर देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावणारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 9:03 AM

Shravan 2022: यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. या महिन्याची एका नव्या दृष्टिकोनातून ओळख करून घेऊ. 

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

लहानपणापासून मनात वसलेली एक कविता श्रावण महिन्याची चाहूल लागताच आबाल-वृद्धांच्या, स्त्री-पुरुषांच्या ओठावर अलगद येते, ती म्हणजे, 'श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहिकडे.'

नुकतीच पेरणी संपल्याने शेतकऱ्याला कामातून सवड मिळते.व्यावहारिक प्रयत्नांना यश मिळावे, ही भावना ठेवून आत्मिक शांतीसाठी पावसाळ्याचे चार महिने तो ईशस्तवनात घालवतो. म्हणूनच श्रावण महिना डवरलेल्या गुलमोहरासारख्या सणांनी नुसता बहरलेला असतो. विविध रंगांची उधळण करून, विविध आकाराच्या पुष्पगुच्छांचे अलंकार लेऊन निसर्ग श्रुंगारलेला असतो. सगळीकडे आनंदी आनंद. धरणीमाता अंगरभर हिरवागार शालू नेसून या आनंदात सामील होते. निसर्गाचं स्वरूप साजश्रुंगारात युवतीप्रमाणे मनाला मोहून टाकते.

श्रावण हा देवधर्म, देशधर्म आणि कृषीधर्माचा महिना. वाण-वैभवाने सृष्टी श्रावणात नटते. हरीभरीत होते. परंतु, वास्तव मात्र वेगळे आहे. ते असे की, दुर्दैवाने मानवी हव्यास आणि आक्रमणामुळे हिरवळ कमी होत आहे. डोंगरदऱ्या उघड्या बोडक्या झाल्या आहेत. नद्या नाले, तलाव, ओढा, झरे कोरडे झाले आहेत. त्यामुळे जमिनीत आणि आकाशात पाणीच नाही. निसर्गाचे सृष्टीचक्र बदलले आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची अत्यावशकता वाढली आहे. त्यासाठी सर्वांनीच परस्पर सहकार्यासाठी कंबर कसली पाहिजे. नुसते, `वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणून चालणार नाही, तशी कृती करावयास हवी.

श्रावण म्हटला, की सुरुवातीला हमखास आठवतो, तो श्रावणी सोमवार. एकभुक्त उपवास, शिवदर्शन, शिवाभिषेक, रुद्राभिषेक, एकादशणी, लघुरुद्र, सहस्रबेल, शिवपूजन. शिवपूजा ही बघण्यासारखी असते. पुष्परचना सुंदर केलेली असते. वस्रप्रावरण, चांदीचे मुखवटे, पंचामृती स्नान, धूप, दीप, मिठाई, फळं, पक्वान्न अन् शंऽऽऽऽभोऽऽऽ अशी मोठ्याने आरोळी. मग आरती, प्रार्थना, मंत्रपुष्पांजली, अर्धी प्रदक्षिणा, पूर्ण दक्षिणा.

या दिवशी भोपळ्याचे महत्त्व जास्तच! गंगाफळ म्हणतात त्याला. उपास सोडण्यासाठी भोपळ्याची भाजी, भजी, आमटी, भरीत, दशम्या, सालाची चटणी, इ. प्रकार भोपळ्याचेच! दूधा-तुपाची रेलचेल असते. हिरवे हिरवे कोवळे गवत खाऊन धष्ट-पुष्ट झालेल्या गायी-बकऱ्या भरपूर दूध देतात. अर्थात, बोर्नव्हिटा, सूप, टू मिनिट्स, कॉम्पेन, न्यूडल्स, मॅगी खाणाऱ्या पिणाऱ्या बॉईज, गर्ल्सना याची खुमारी कधी आणि कशी कळणार? अशा वाट चुकलेल्या पिढीला आपल्या संस्कृतीकडे पुनश्च वळवणारा असा हा श्रावण!

सोमवारी शिवामूठ, मूग, तांदूळ, तीळ इ. धान्य यथाशक्ती किंवा कमीत कमी मूठभर, मंदिरात वाहतात. त्यात दानाचं महत्त्व आपल्याकडील थोडंसं दुसऱ्याला देण्याचं महत्त्व, जगा आणि जगू द्या, असा संदेश वदवून दिला आहे. थेंबे थेंबे तळे साचे. कहाणीतील म्हातारीने घरच्या सर्वांना तृप्त करून मगच छोटा पेलाभर दूध गाभाऱ्यात ओतून राजाकडून गावभरचे दूध सक्तीने आणि शक्तीने ओतूनही न भरलेला गाभारा क्षणात भरला, हा चमत्कार नसून साक्षात्कार आह़े एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, किंवा गाव करी ते राव काय करी, या म्हणी सार्थ करणाऱ्या त्या घटना आहेत. मंदिराची निगा राखणारे भोपी, गुरव, पुजारी, बेलफुल विकणारी, ब्राह्मण, व्यवस्थापक, सेवक, सफाईवाला, इ. लोकांना त्यांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्यात मेवा मिळावा, यासाठी हे अल्पसे दान, पुण्य, धर्म! त्यांना त्यादिवशीचे पूर्ण वाढलेले ताट केळीच्या पानावर, नैवेद्य म्हणून नेऊन देतात. हे ताट चारीठाव उजवे-डावे बघून सर्व अद्ययावत पदार्थ त्यात वाढलेले असतात. त्याचा स्वाद आणि तृप्तता अगदी वेगळी असते. आजकालच्या तयार खाद्यपदार्थांच्या जमान्यात अशी तृप्तता मिळणे कठीण आहे.

चला तर मग, आपणही या श्रावणात देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावूया!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल