शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 11:13 AM

Shravan 2023: श्रावणात अनेक जण महिनाभर एकवेळ उपास करतात तर काही जण सण वारानिमित्त उपास करतात, पण उपास करताना दिलेले नियम पाळतात का? ते बघणं महत्त्वाचं!

>> पं. हृषीकेश श्रीकांत वैद्य, धर्मसभा, राष्ट्रीय सचिव 

आज नवरात्री, एकादशी/ शिवरात्री/सोमवार/ चतुर्थी /शनिवार आहे , आज माझा उपास आहे ! असं आस्तिक लोक सर्रास म्हणतात. उपास हा शब्द शास्त्रात / वेदांत कुठे ही नाही. मग उपास म्हणजे नक्की काय? उपासाचा अर्थ काही खाऊ पिऊ नये हा आहे का? की कंद, फळं, दूध इ उपासाचे पदार्थ खावे - त्याला उपास म्हणतात; असा आहे ? असे प्रश्न अनेकांना पडतात. 

आस्तिक जनहो, खरंतर उपसाचं खाण्या-पिण्याच्या पदार्थांशी तसं फार काही विशेष देणं घेणं नाही. उपासाचे खरे देणे घेणे आहे ते देवाशी - परब्रह्माशी ! ते कसे काय? चला जाणून घेऊया 

उपास हा "उपवास" शब्दाचा अपभ्रंश आहे. उपवास (उप=जवळ, वास= सहवास) म्हणजे आपले शरीर, वाचा,  मन, बुद्धी व चित्त देवा समीप ठेवणे. उपवासाचा दिवस म्हणजे तहान भूक विसरून तन्मय होऊन देवाची भक्ती करत त्याच्याशी एकरूप होण्याचा दिवस. ज्याच्या सहवासाने आपण पापांपासून उपावृत्त(निवृत्त) होतो तो उपवास. 

उपवासाच्या दिवशी या नश्वर देहाला सांभाळण्यासाठी धान्य आदि निवडणे-टिपणे, चूल पेटवणे, रांधणे (जेवण बनवणे), भांडी घासणे, भांडी जागी लावणे, लादी पुसणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, केस- नखं कापणे, मेकअप करणे, चुगल्या करणे, इ. गोष्टींमध्ये वेळ ने घालवता विशिष्ट तिथी किंवा वारी फक्त कंद-मूळ, फळं - दूध इ सात्विक आहार घेऊन किंवा काहीही न खाता पिता तो सगळा वेळ देवाच्या आराधनेसाठी (नामस्मरण, भजन, पूजन, ध्यान, इ.) व्यतीत करावा. देहाचे शोषण करावे - हाच खरा उपवास!  मस्त तुपातले-दाणे-आलं-मिरची घालून चमचमीत पदार्थ बनवण्यात दिवस घालवणे हा काही उपवास नाही बरं !

किमान उपवासाच्या दिवशी विविध  इंद्रियांच्या विविध खाद्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कानांनी काय ऐकावे-काय ऐकू नये मुखाने काय बोलावे -काय बोलू नयेडोळ्यांनी काय बघावे - काय बघू नयेनाकाने काय घ्राणावे - काय घ्राणू नये जिव्हेने कसला स्वाद घ्यावा- कसला घेऊ नये. 

सगळ्या इंद्रियांना देवाकडे केंद्रित करावे हाच खरा उपवास ! बृहदारण्यक उपनिषद, गौतम धर्मसूत्र, काठक गृह्यसूत्र व महाभारत या इतिहास ग्रंथात उपवास कसा व का करावा याची सविस्तर माहिती आहे. 

अनेकांना वाटतं की काही न खातापिता आपण आनंदाने देवाचे स्मरण कसे करू शकतो ? अहो, जर परमेश्वरा प्रति  भक्ती/प्रेम असेल, त्याला भेटण्याची ओढ असेल तर त्यापूढे तहान भूक नक्कीच विसरू शकतो. उदाहरण घ्या जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेपासून अत्यानंद प्राप्त होतो तेव्हा आपण तहान - भूक विसरून जातो ; दिवसभर न खाता पिता धावपळ करत राहू शकतो. तेव्हा अशक्तपणा ही येत नाही. तर जो आनंदकंद आहे तोच मिळणार आहे अशी दृढ श्रद्धा असेल तर तहान-भूक नाही का हरपणार ? 

वैज्ञानिक दृष्ट्याही महिन्यातून काही दिवस लंघन करणे हे शरीरासाठी उपयुक्त मानले गेले आहे. तर, उपास / उपवास म्हणजे नक्की काय याचा जुजबी अंदाज आता तुम्हाला नक्कीच आला असेल. 

संपर्क : 9323395598

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स