शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Shravan 2023: धेनु ऋण कशाला म्हणतात? मृत्यूपूर्वी ते का आणि कसे फेडता येतात? जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 1:39 PM

Shravan 2023: आपल्याकडे म्हण आहे, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही'; या म्हणीचा अर्थ आणि त्याच्याशी संबंधित धर्माचरण जाणून घेऊया. 

>> सुजित भोगले 

मराठीत अनेक म्हणी आहेत, ज्यांचा वापर केला असता कमी शब्दात अचूक आशय पोहोचवता येतो. अशीच एक म्हण म्हणजे, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' म्हणजेच कुणाच्या बोलण्याने कुणाचे काम अडत नाही की त्यात विघ्नही येत नाही. हे सांगण्यासाठी कावळा आणि गाय यांचेच रूपक का योजले आहे ते पाहू. 

दशक्रिया विधी केला जातो तिथे जर पिंडाला कावळा शिवला नाही.. अर्थात प्रेतात्मा पुढील गतीला गेला नाही हे उघड झाल्यावर सगळेच थोडेसे हतबल होतात.. मग दर्भाचा कावळा बनवला जातो आणि त्याने पिंडाला स्पर्श करतात आणि तो पिंड गायीला खायला घालतात.. 

गायीलाच का ? 

तर ती सुद्धा मृत्यूलोक आणि मानवलोकातील दुवा मानली जाते.. तिला दिलेले अन्न अतृप्त आत्म्याच्या पापांचे शमन करून त्यांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल अशी श्रद्धा आहे.. 

थोडक्यात जिवंतपणे ज्याने गाईंना अन्न दिले नसेल तर ते ऋण बाकी आहे.. याला धेनु ऋण म्हणतात.. कारण गाईचे पदार्थ आपण भक्षण करतो. .पण त्याची परतफेड केली नाही तर धेनु ऋण शिल्लक आहे असे म्हणतात.. 

मग हे धेनु ऋण परतफेड करावी.. तिच्या आशीर्वादाने प्रेतात्म्याच्या अन्य वासनांचे शमन व्हावे आणि त्याने पुढील गतीला जावे हा हेतू.. 

या सगळ्या प्रक्रियेत.. प्रेतात्म्याचे अस्तित्व जाणवल्याने पिंडाला न स्पर्श करणारा कावळा उपाशीच राहिला ना.. 

तो उपाशी कावळा आपल्या वाटणीचा पिंड गायीला मिळाला म्हणून तिला शाप देतो... 

परंतु गाय मुळातूनच दैवी प्राणी आहे त्यामुळे या शापाने तिला काहीही फरक पडत नाही....म्हणूनच  म्हणतात... कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...!

तात्पर्य : कोणी काही शाप दिला, अपशब्द काढले म्हणून आपण खचून जाण्याचे कारण नाही. आपला स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्त्वावर विश्वास हवा आणि त्याबरोबरच आपल्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान हवे याकरिता धर्मपालन केले पाहिजे. त्यामुळे यापूर्वी जर तुमच्याकडून गोसेवा झाली नसेल तर आजपासून सुरू झालेल्या श्रावण मासात गोसेवेची संधी दवडू नका. कारण 'धर्मो रक्षति रक्षित:' म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म रक्षण करतो, हे लक्षात ठेवा!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल