शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Shravan Katha 2022: महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेत महादेवांनी उद्धार कसा केला? त्या सौदागर रूपाची ही कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:36 IST

Shravan Katha 2022: भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात पण ते आधी भक्तांची परीक्षा सुद्धा घेतात. शिवभक्त महानंदा महादेवांच्या परीक्षेत उत्तीर्ण कशी झाली त्याची ही कथा... 

काश्मीरमधील नंदीग्रामात महानंदा नावाची वारांगना राहत असे. त्या गावात तिचे राजासारखे ऐश्वर्य होते. ती अत्यंत रूपवान व सुलक्षणी होती. ती नृत्यगायनात प्रवीण होती. लहानपणापासून ती शिवाची भक्ती करीत असे. तिने आपल्या नृत्यागारात शिवलिंग ठेवले होते. ऐन तारुण्यातसुद्धा सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री ही व्रते ती आचरित असे. रोज लक्ष बेल वाहून शंकराची ती पूजा करीत असे. प्रतिसोमवारी ब्राह्मणांकडून शिवाला अभिषेक करवित असे. श्रावण महिन्यात कोटी लिंगार्चन करण्याचा तिचा नियम होता. अतिथीना जे इच्छित ते ती पुरवीत असे. तिने आपल्याकडील पाळीव कोंबडी आणि माकडाला नृत्य शिकवले होते. ती त्यांना रोज स्नान घालून विभुती लावत असे. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. त्या दोघांना नेहमी ती आपल्या नृत्यागारात बांधून ठेवी. 

महानंदा जरी वारांगना होती, तरी ती आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक होती. म्हणजे एखाद्या पुरुषाला तीन दिवस अगर सात दिवस आपल्या घरी प्रवेश करण्यास तिने अनुमती दिली तर त्या अवधीत ती दुसऱ्या पुरुषाकडे पाहत नसे. 

तिच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एके दिवशी शंकर सौदागराच्या वेषाने तिच्याकडे आले. दारात आलेल्या अतिथीचा यथायोग्य सत्कार करून तिने त्यांचे कुशल विचारले. त्या सौदागराच्या हाताला रत्नजडित कांकण होते. त्याकडे महानंदाचे सहज लक्ष गेले. ते जाणून सौदागराने महानंदेला ते कांकण दिले.  ते मिळाल्यावर महानंदेला मोठी धन्यता वाटली. तिच्या आग्रहावरून सौदागराने तीन दिवस तिच्या घरी राहण्याची कबुली दिली. त्यावर त्याने आपल्या जवळची शिवपिंडी महानंदेजवळ दिली आणि `हे माझे प्राणलिंग आहे. हे तू जिवापलीकडे जतन केले पाहिजे. मी निघतेवेळी ते परत घेऊन जाईन', असे सांगितले. त्याप्रमाणे, 'हे लिंग हरवले किंवा भंगले तर मला अग्निकाष्ठ भक्षण करावे लागेल. म्हणून तू शक्यतो दक्षता राख' असेही बजावले. 

महानंदेने ती पिंडी आपल्या नृत्यागारात नेऊन ठेवली आणि सौदागराच्या सेवेत ती तत्पर राहिली. शंकरांच्या आज्ञेवरून अग्निनारायणाने नृत्यागरात प्रवेश केला. तोच चहुकडून लोक `आग लागली, आग विझवा' असे म्हणत ओरडू लागले. ते ऐवूâन महानंदा खडबडून जागी झाली. तिचे हातपाय लटपटू लागले. कसेबसे जाऊन तिने पाळीव कोंबड्याला आणि माकडाला मुक्त केले. थोड्या वेळात नृत्यशाळा जळून भस्म झाली.

इतक्यात सौदागर उठला आणि त्याने `माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? असा महानंदेला प्रश्न केला. तेव्हा ती थरथर कापू लागली. हात जोडत म्हणाली, 'स्वामी, लिंग भस्म झाले.' 

तेव्हा सौदागर म्हणाला, 'आज माझ्या मुक्कामाचा दुसरा दिवस. लिंग भस्म झाले असे म्हणतेस त्या अर्थी क्षणाचाही विलंब न लावता मला माझे पुढचे काम करावे लागेल' असे म्हणून त्याने अग्निकुंड तयार करून ऊँ नम: शिवाय म्हणत त्यात उडी टाकली. ते दृष्य पाहताच महानंदेनेही अग्निकाष्ठ भक्षण केले. 

तोच अग्नि शांत झाला आणि महानंदेसह शंकर अग्निकुंडातून वर आले. शंकर म्हणाले, `महानंदे, तुझी परीक्षा पहाण्यासाठी मी सौदागर होऊन आलो होतो. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. `इच्छित वर माग!' तेव्हा महानंदा हात जोडून म्हणाली, `महादेवा, हे सारे नगर  उद्धरून शिवलोकी न्यावे, यापेक्षा माझे दुसरे काहीच मागणे नाही.' शंकर तथास्तू म्हणाले. 

अशा तऱ्हेने महानंदेने एक वारांगना असूनही केवळ भक्तीच्या बळावर स्वत:चा आणि इतरांचा उद्धार करून घेतला व शिवकृपा प्राप्त केली. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल