शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

By देवेश फडके | Updated: April 23, 2025 15:18 IST

Shree Swami Samarth Smaran Din April 2025: सलग तीन दिवस स्वामींची सेवा करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या...

Shree Swami Samarth Smaran Din April 2025: संपूर्ण चैत्र महिन्याभर स्वामी कृपेचा वर्षाव होत असतो, असे म्हटले जाते. कारण चैत्र शुद्ध द्वितीयेला ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो, तर चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन असतो. म्हणजेच चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. यंदा, ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतारकार्य समाप्तीचा दिवस आहे. गुरुवार, २४ एप्रिल २०२५ ते २६ एप्रिल २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत स्वामी समर्थांची विशेष सेवा करता येऊ शकेल. 

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी महाराजांनी आपल्या अवतारकार्यात अनेक लीला केल्या. अनेकांचा उद्धार केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. 

३ दिवस स्वामी सेवा कशी करावी?

गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा, भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे, हे मनाशी पक्के करावे. ही सेवा ही सुरुवात आहे, असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे.

स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृताचे पारायण

शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे.  या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पद्धतीने पारायण करावे. तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पण एकदा संकल्प केला की, त्यात खंड पडू देऊ नये. 

‘या’ गोष्टी आवर्जून कराव्यात

स्वामींची सेवा मनापासून करावी. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा. तसेच स्वामींना पिवळ्या रंगांचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत. तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. स्वामी महाराजांच्या स्मरण दिनी शक्य असेल, त्या गोष्टींचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम. शक्य असेल गुरुवारपासून ते स्मरण दिनापर्यंत सलग तीन दिवस या गोष्टी कराव्यात. तीन दिवस शक्य नसेल, तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरण दिनी आवर्जून या गोष्टी कराव्यात. 

‘हे’ कायम लक्षात ठेवाच

- आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. 

-  अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे. 

- मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. 

- एकदा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. 

- शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी. 

- स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकshree datta guruदत्तगुरु