शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, पण नंतर उमगते, 'जे होते ते चांगल्यासाठी!'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 8:00 AM

ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याचा फार विचार करू नका. कदाचित भविष्यात तुम्हीच म्हणाल, जे होतं ते चांगल्याचसाठी!

गीतेचे सार तुम्ही वाचले आहे का? त्यात म्हटले आहे, 'जे झालं ते चांगल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी, जे होणार आहे तेही चांगल्यासाठी.' एका मर्यादेनंतर परिस्थिती जेव्हा आपल्या हातात उरत नाही, तेव्हा गीतेचे सार लक्षात आपण लक्षात घेतले, तर अकारण त्रागा होणार नाही आणि आपणच मान्य करू, जे होते, ते चांगल्यासाठी!

एकदा दिल्लीतले एक डॉक्टर व्याख्यानासाठी दुसऱ्या शहरात जात होते. विमानप्रवासाने त्यांना जायचे होते. ते प्रवासासाठी वेळेत पोहोचले आणि विमानही वेळेत निघाले. इथवर सगळे व्यवस्थित झाले आता व्याख्यानाचा नियोजित कार्यक्रमही वेळेत पार पडावा, या विचाराने त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि आपला लॅपटॉप काढून व्याख्यानातील मुद्द्यांचा विचार करू लागले. प्रवास छान सुरू होता. परंतु, काही काळातच हवामान बिघडले. आणि विमानचालकाला दुसऱ्या विमानतळावर नाईलाजाने विमान उतरवावे लागले. अवघ्या काही तासांचा प्रवास उरलेला असताना अशी गडबड झालेली पाहून डॉक्टर गोंधळले. वेळेत पोहोचलो नाही, तर लोक ताटकळत राहतील. त्यांनी आयोजकांना फोन केला आणि आपण उतरलेल्या ठिकाणाची माहिती दिली. आयोजक म्हणाले, 'डॉक्टरसाहेब, तुम्ही तिथून टॅक्सीने आलात तरी तीन तासात इथे पोहोचाल आणि कार्यक्रम वेळेत सुरू होईल.'

डॉक्टरांना मोठ्या मुश्किलीने तिथे जायला एक टॅक्सी मिळाली. डॉक्टरांनी टॅक्सीचालकाला पत्ता सांगून वेळेत पोहोचवण्याची विनंती केली. टॅक्सीचालकाने प्रवास सुरू केला, पण त्यालाही वादळाचा सामना करावा लागला. त्या वादळात आणि पाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसात टॅक्सीचालक मार्ग भरकटला. त्याच्या लक्षात येताच त्याने माफी मागितली आणि आता काही वेळ एका ठिकाणी थांबून मग पुढचा प्रवास करावा अशी विनंती केली. 

डॉक्टरांचा नाईलाज झाला. टॅक्सीचालकाने टॅक्सी थांबवली, तिथे एक झोपडीवजा घर होते. त्या दोघांनी घराचे दार ठोठवले आणि तिथल्या आजींना घरात घेण्याची विनंती केली. आजींनी त्यांना आत घेऊन चहा पाणी दिले. डॉक्टरांनी आजींचे आभार मानले. आजी आपल्या झोपलेल्या नातवाकडे बोट दाखवत म्हणाल्या, `माझे आभार मानू नका. सदिच्छा द्यायच्याच असतील, तर माझ्या नातवाला द्या. त्याला आशीर्वादाची गरज आहे. तो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. दिल्लीतले एक ख्यातनाम डॉक्टर आहेत, तेच एकमेव याचा इलाज करू शकतील. पण त्याचे आई वडील वारले. मी म्हातारी त्याला कसे काय नेणार? तुमच्या सदिच्छा त्याला मिळाल्या तर काही चमत्कार घडेल.'

डॉक्टर म्हणाले, `आजी चमत्कार घडला आहे. तुम्ही ज्या डॉक्टरांबद्दल बोलताय, तो मीच आहे. आज मला व्याख्यानाऐवजी देवाने इथे तुमच्या नातवाच्या मदतीसाठीच पाठवले आहे. मी त्याचे उपचार अवश्य करीन. उगीच मी मगापासून राग राग करत होतो. परंतु म्हणतात ना, जे होते ते....चांगल्याचसाठी!'