शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

आपल्या दिवसाची आणि नव वर्षाची प्रसन्न सुरुवात 'या' श्लोकांनी करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 8:00 AM

अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे. 

आपली सकाळ कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळ प्रसन्न तर दिवसही मजेत जातो. म्हणून सद्विचारांचे बीज सुपीक डोक्यात पेरून दिवसभर मनाची उत्तररित्या मशागत करावी. अशात आज नवं वर्षाचा पहिला दिवस! यासाठी आपल्या संस्कृतीने उत्तम संस्कार घातला आहे. तो कोणता, हे सविस्तर जाणून घेऊया. 

प्रात:काली अंथरुणावरून उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे श्लोक व मंत्ररुपाने स्मरण करावे. या उपचाराला प्रात:स्मरण म्हणतात. याविषयी एका श्लोकात वर्णन केले आहे,

ब्राह्मे मुहुर्ते चोथात्म चिन्तयेदात्मनो हितम् स्मरणं वासुदेवस्य कुर्यात् कलिमलावहम्

ब्राह्म मुहूर्ती उठून आत्मकल्याणाचे चिंतन करावे. त्याचप्रमाणे कलीदोष दूर करणारे वासुदेवाचे स्मरण करावे. प्रात:स्मरण करण्याचे काही विधीसंकेत आहेत. आपण काही ब्राह्म मुहूर्तावर उठणाऱ्यातले नाही. निदान, जेव्हा उठू, तेव्हा ईश स्मरणाने सुरुवात नक्कीच करता येईल. 

आदित्य गणनाथं च देवी रूद्रं यथाक्रममनारायणं विशुद्धाख्यमनोच कुलदेवताम

सूर्य, गणपती, देवी व विशुद्ध कीर्तीचा नारायण यांचे यथाक्रम स्मरण करून शेवटी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात सूर्यस्मरणाचे, गणपतीस्मरणाचे, देवी स्मरणाचे, शिवाच्या स्मरणाचे व भगवान विष्णूच्या स्मरणाचे श्लोक दिले आहेत.

नवग्रह, भृग्वादी ऋषी, सनत्कुमारादी देवर्षी, सप्तलोक, सप्तसमुद्र, सप्तर्षी, सप्तकुलपर्वत, पृथू, अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृष्ण, परशुराम हे सप्तचिरंजीव, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पतिव्रता, पाच पांडव, नल, युधिष्ठिर इ. पुण्यश्लोक राजे, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती ही मोक्षदायी तीर्थक्षेत्रे यांचे पुण्यस्मरण करावे. चारित्र्य, कर्तृत्व, श्रेष्ठत्व असलेल्या पुण्यशील विभूतींचे, श्रद्धा स्थानांचे पुण्यस्मरण, नामसंकीर्तन करावे. ज्यांच्या स्मरणाने मन:शांती प्राप्त होते. आपल्या जीवनातील अंध:कार जाऊन जीवन प्रकाशमय होईल अशा चैतन्यशील प्रेरणादायी श्रेष्ठतम गुणवर्धक रुपांचे चिंतन, स्मरण करावे. हा हिंदूंचा मूलाधार आहे. जीवन सुखसमृद्ध करणाऱ्या सृष्टीतल्या सर्व गोष्टी व भूतमात्रांबद्दलची कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

यथोचित प्रात:स्मरण झाल्यावर ज्या भूमीवर आपले सर्व जीवन व्यवहार चालतात, जिच्या आधअरावर आपले सर्वस्व उभारले, तारले जाते, अशा भूमीमातेला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून श्लोक म्हणावा. 

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले,विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।

समुद्राचे वस्त्र परिधान करणाऱ्या व पर्वतरूपी उरोजांनी शोभणाऱ्या हे विष्णूपत्नी भूमाते, तुला नमस्कार आहे. माझ्या पायाचा तुला स्पर्श होतो त्याबद्दल मला क्षमा कर. प्रात:स्मरण हे हिंदू जीवन संस्काराचा श्रीगणेशा आहे. अशा संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकली. वर्धिष्णु झाली. यातच आपल्या परंपरेची चिरंतन थोरवी आहे. अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे.