शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 10:26 IST

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: ४५ तास मौन व्रताचरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ नारळ पाणी आणि द्रासाचा रस आहारात घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट कन्याकुमारी गाठले आणि मौन व्रत तसेच ध्यानसाधनेचा संकल्प केला. ४५ तास नरेंद्र मोदी ध्यानसाधना आणि मौन व्रताचरण करणार आहेत.

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ध्यानधारणा, मौन व्रत याला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनी तसेच संत-महंत मंडळी यांनी ध्यानधारणा, मौन व्रताचे केवळ आचरणच केले नाही, तर त्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. ध्यान साधनेत मोठे बळ असते. ध्यानधारणा आणि मौन राहिल्यामुळे अनेक प्रश्नांची उकल आपलीच आपल्याला होऊ शकते. मन एके ठिकाणी शांत चित्त केले की, शांततेत विचार केला जाऊ शकतो. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. गौतम बुद्धांनीही ध्यान साधना आणि मौन व्रताचरणातून अनेक गोष्टी साध्य केल्याचे सांगितले जाते. ध्यानाचे आणि मौन व्रताचे अनेक फायदे, लाभ सांगितले जातात. 

कन्याकुमारी आणि स्वामी विवेकानंद

गुरु रामकृष्णांकडून संन्यास दीक्षा घेतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भारतभ्रमण केले. देशातील परिस्थिती याची देही याची डोळा पाहिली. कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. समुद्रात उडी मारली आणि जवळच असलेल्या शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदांत विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांना आपल्या जीवनाचा उद्देश सापडला, असे सांगितले जाते.

नरेंद्र मोदींचा ध्यान साधनेचा संकल्प आणि मौन व्रत

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०० पेक्षा जास्त रॅली, तब्बल १८० रोड शो आणि सभा घेतल्या. संपूर्ण भारतभरातील अनेक मतदारसंघात जाऊन जनतेला संबोधित केले. यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक येथे जाऊन ध्यान साधनेला सुरुवात केली. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सायंकाळी ध्यानाला सुरुवात केली. १ जून रोजी सायंकाळपर्यंत नरेंद्र मोदी ध्यान साधना करणार आहेत. ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले होते, तिथेच पंतप्रधान मोदी ध्यानाला बसले आहेत. 

असा असेल ४५ तासांचा ध्यानकाळ

४५ तासांच्या ध्यानधारणेदरम्यान नरेंद्र मोदी फक्त द्रव आहार घेतील. फक्त नारळ पाणी आणि द्राक्षाचा रस मोदी घेणार आहेत. हे संपूर्ण ४५ तास मोदी मौन व्रतात असणार आहेत. ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी भगवती अम्मान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. कन्याकुमारी देवीची मूर्ती भगवान परशुरामाने ३ हजार वर्षांपूर्वी स्थापन केली होती, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. एखाद्या पंतप्रधानाने देवीचे दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद