शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

रोज सकाळी स्वतःला एकच गोष्ट सांगा, थांबायचे नाय गड्या थांबायचे नाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 8:00 AM

जेव्हा शरीर साथ देणार नाही, तेव्हा सक्तीने थांबावेच लागणार आहे. तेव्हा निवृत्ती घ्यावीच लागणार आहे. मग जोवर तन, मन कार्यरत आहे, तोवर थांबायचे का आणि कोणासाठी?

 प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस ही नवीन काही करून दाखवण्याची संधी असते. परंतु मनुष्य स्वभावच असा असतो, की काही प्रयत्नात तो हताश होतो. निसर्गाकडे, पशु पक्ष्याकडे पाहिले तर लक्षात येईल, काहीही झाले तरी त्यांचे प्रयत्न थांबत नाहीत. थांबतो तो केवळ माणूस! 

अलीकडे तरुण मुलं मुली नैराश्याने आयुष्य थांबवतात, त्यांना कोणी सांगायला हवं, हे तुझं थांबण्याचं वय नाही, जेव्हा शरीर साथ देणार नाही, तेव्हा सक्तीने थांबावेच लागणार आहे. तेव्हा निवृत्ती घ्यावीच लागणार आहे. मग जोवर तन, मन कार्यरत आहे, तोवर थांबायचे का आणि कोणासाठी? जो थांबला तो संपला!

आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे. घोडा का अडला? भाकरी का करपली? आणि पान का खराब झाले? तर फिरवले नाही म्हणून! सातत्य प्रत्येक गोष्टीत लागते. साधारण वस्तू सुद्धा काही दिवस वापरात नसेल तर ती बंद पडते, बिघडते. मग आपले शरीर तर फार मोठे यंत्र आहे. ते क्रियाशील ठेवण्यासाठी रोज सकाळी स्वतःला सूचना करायची, अपयश आले म्हणून काय झाले? थांबायचे नाही. यश मिळाले तरी इथे थांबायचे नाही. एक प्रयत्न फसला, तर दुसरा प्रयत्न यशस्वी होईल. आपल्याला जीवनात अगणित संधी उपलब्ध आहेत. फक्त आपण त्यांचा वापर कसा करून घेतो यावर सर्व काही अवलंबून आहे. चला तर संधीचे सोने करूया आणि कामाला लागूया.