शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...दहा हजार वर्षं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 04:54 IST

आपण प्रवासात असलो, की सारखे विचारले जाणारे प्रश्न.. आपण पोहोचलो का तिथे? अजून किती वेळ आहे? मग कधी पोहोचणार?

- धनंजय जोशीसुट्टीसाठी म्हणून सगळ्या कुटुंबाला, मुलांना घेऊन प्रवासाला जाणाऱ्यांना हा अनुभव आला असेलच. आपण प्रवासात असलो, की सारखे विचारले जाणारे प्रश्न.. आपण पोहोचलो का तिथे? अजून किती वेळ आहे? मग कधी पोहोचणार?तशीच एक गोष्ट ! उंंटाचं एक कुटुंब वाळवंटात फिरत असतं - वडील उंट, आई उंट आणि बेबी उंट ! वडील उंट जरा शांत प्रकृतीचे असतात. बेबी उंट सारखा एकच प्रश्न विचारत असतो, ‘बाबा, आपण पोहोचलो का?’वडील उंट उत्तर देतात, ‘तुला किती वेळा सांगितलंय मी, की आपली भटकणारी जात आहे. आपण कधीही कुठेही पोहोचत नसतो. त्यामुळे आपण फक्त आनंदाने प्रवास करायचा. ‘पोहोचणार कधी?’ असे प्रश्न विचारायचे नाहीत.’ ही गोष्ट पहिल्यांदा वाचली तेव्हा मला जरा हसू आलं. वाटलं, हे वडील उंट बहुतेक सान सा निम यांना पूर्वीच्या आयुष्यात भेटलेले असावेत. सान सा निम आम्हाला सांगायचे, ‘ट्राय, ट्राय, ट्राय, टेन थाउजंड इयर्स, नॉन-स्टॉप!...’ तुमचं काम एवढंच, की फक्त प्रामाणिकपणे साधना करायची. हे करून आपण कुठे पोहोचणार आणि काय मिळवणार याचा विचार नाही करायचा!आता दहा हजार वर्षं म्हटल्यानंतर लगबगीने कुठे पोहोचण्याची घाई निघूनच गेली की नाही? आपल्या आयुष्यात अगदी आपल्या दैनंदिन जीवनात ही घाई आपल्याला उगाचच चिंतित करून जात असते. काहीही करून कुठे ना कुठेतरी पोहोचण्याची जरूरच समजा नाहीशी झाली की, आपण शंभर टक्के ‘आत्ताच्या क्षणी’ जगू शकू... ‘आत्ता’ जे आहे, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करू शकू!! एका प्रसिद्ध झेन गुरुंना त्याच्या शिष्याने विचारलं, ‘मास्टर, माझी साधना म्हणजे एखाद्या शिडीवर चढून गेल्यासारखी वाटते. चार पायºया वर आणि तीन पायºया खाली ! मी काय करू?’झेन गुरु म्हणाले, ‘ते शिडी वगैरे सोडून दे. आपण कुठेही जायचं नाही, की कुठेही चढायचंही नाही. आपलं सगळं काम जमिनीवर!’