शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

सुखाच्या मागे जेवढे धावाल ते आणखीनच पुढे धावेल, यासाठी करा एक उपाय ... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 7:00 AM

अति घाई संकटात नेई, हा फलक केवळ वाहनवेगावर नियंत्रण ठेवा हे शिकवणारा नाही, तर आयुष्यावर नियंत्रण ठेवा हे शिकवणारा आहे!

एका गुरुकुलात गुरुदेव मुलांना बाण मारायला शिकवत होते. एका अतिउत्साही शिष्याने धनुष्य इतके जोरात ओढले की त्याचे दोन तुकडे झाले. गुरुदेवांनी शिष्याला शिकवले की अधीरतेमुळे क्षमता वाया जाते. लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी ऊर्जा वापरून लक्ष्य साध्य करणे अशक्य आहे. आपले जीवनही धनुष्यबाण आहे. संयमाने ऊर्जा जमा करण्याची कला अंगी बाणवायला शिकली पाहिजे, तरच ध्येय कितीही दूर असले तरी असाध्य राहत नाही.

संयमाचा अर्थ फक्त शांतपणे वाट पाहणे असा नाही. संयम म्हणजे उत्तेजित न होता सतत तुमच्या कामात व्यस्त राहणे. कोणत्याही कामाबद्दल उत्साह किंवा असंयम हे त्या कार्याचे फळ परिपक्व होऊ देत नाही. चाकावर आकार घेत असलेला मातीचा घडा तयार होण्याआधीच बाहेर काढला तर त्याचा आकार बिघडून जाईल. त्याला उचित वेळ दिला पाहिजे. रोज थोडी थोडी केलेली प्रगती भविष्यात मोठा बदल घडवत असते.झटपट यशाच्या हव्यासापोटी आपण संयम गमावतो, घाईघाईने निर्णय घेतो, ज्यामुळे आपले भविष्य बिघडू शकते.

तरुणांकडे उर्जेचा साठा जास्त असतो. ही ऊर्जा त्यांना कमी वेळात जास्त काम करून जास्त फळ मिळवण्याची महत्त्वाकांक्षा जागृत करते. या ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा हे त्यांना माहीत नसते. त्यांना ताबडतोब प्रगती दिसली नाही तर ते नैराश्यात जातात. जीवाचे बरे वाईट करून घेतात. अशा वेळी आपल्या कर्मावर आणि देवावर नितांत श्रद्धा असायला हवी. असे म्हणतात, फांदीवर बसणाऱ्या पक्ष्याला फांदी तुटायची भीती नसते कारण त्याचा आपल्या पंखांवर विश्वास असतो. तो योग्य संतुलन बाळगून असतो. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ ब्रायन वाईज म्हणतात, “आध्यात्मिक विकास म्हणजे संयम राखणे. सहनशीलता ही नियतीला त्याच्या नैसर्गिक गतीने पुढे जाण्यास अनुमती देते.' हे लक्षात ठेवा आणि धीर धरा. तुमचीही प्रगती होत आहे आणि एक ना एक दिवस तुम्ही स्वकष्टावर आपले ध्येय गाठणार आहात. त्यासाठी सुखाच्या मागे धावणे सोडा. आपले कर्तव्य करत राहा, सुख आपोआप तुमच्या जवळ येऊन बसेल, खात्री बाळगा!