शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

'भांsssजे' अशी आरोळी देणाऱ्या शकुनी मामांचे दक्षिणेत मंदिरही आहे; कोणत्या कारणामुळे? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:13 IST

भारत हा एकमेव देश असेल जिथे रामाची आणि रावणाचीही पूजा करणारे भक्त आहे. तर उपरती झालेल्या आणि शिवकृपेस पात्र ठरलेल्या शकुनी मामाचे मंदिर असू शकेल यात काय ते नवल!!!

भारताच्या विविध भागात शेकडो मंदिरे आहेत ज्यात देवतांची पूजा केली जाते. मात्र, दक्षिण भारतात असे एक मंदिर आहे. जिथे देवतांची नाही तर महाभारत युद्ध घडवणाऱ्या दुर्योधनाचा मामा शकुनीची पूजा केली जाते. असे म्हणतात की जो कोणी त्याची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला, जाणून घेऊया या मंदिराचे महत्त्व आणि मंदिराच्या स्थापनेची कहाणी-

महाभारत युद्ध संपल्यावर दुर्योधनाचा मामा शकुनी याने महाभारतात लाखो जीवांच्या मृत्यूचे कारण आपण बनलो या पश्चात बुद्धीने प्रायश्चित्त केले, असे म्हणतात. यामुळे लाखो लोक मारले गेलेच, पण साम्राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. या पश्चातापाने शकुनी अतिशय हताश झाले व त्यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून संन्यासी जीवन अंगीकारले. नंतर, मामा शकुनीने केरळ राज्यातील कोल्लम येथे भगवान शिवाची मन एकाग्र करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. यानंतर भगवान शंकरांनी त्यांना दर्शन देऊन त्यांना पापमुक्त केले असे म्हणतात. 

मामा शकुनीने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, त्या ठिकाणी सध्या हे मंदिर आहे, ज्याला मायामकोट्टू मलंचरुवू मलानाद मंदिर म्हणतात. ज्या दगडावर बसून त्यांनी शिवाची तपश्चर्या केली. त्या दगडाची पूजा केली जाते. सध्या या जागेला पवित्रस्वरम म्हणतात.

या मंदिरात मामा शकुनीशिवाय देवी माता, किरातमूर्ती आणि नागराज यांची पूजा केली जाते. या ठिकाणी वार्षिक मलक्कुडा महालसवम उत्सव आयोजित केला जातो, ज्याला हजारो लोक उपस्थित असतात. यावेळी मामा शकुनीची पूजा केली जाते. एकदा कौरव पांडवांच्या शोधात या ठिकाणी पोहोचले होते असेही म्हणतात. त्यावेळी त्यांनी शकुनी मामाला कोल्लमबद्दल सांगितले होते. अशीही कथा आहे. 

भारत हा एकमेव देश असेल जिथे रामाची आणि रावणाचीही पूजा करणारे भक्त आहे. त्याचबरोबर हे दोघेही अस्तित्त्वातच नव्हते किंवा रामायण घडलेच नाही असेही म्हणणारा एक गट आहेच. तरीदेखील दोघांचे उत्सव होतात. तर उपरती झालेल्या आणि शिवकृपेस पात्र ठरलेल्या शकुनी मामाचे मंदिर असू शकेल यात काय ते नवल!!!