शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भाग्य बदलण्यासाठी 'या' दोन गोष्टी पुरेशा असतात; तुमच्याकडे त्या आहेत का? तपासून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:49 PM

आपल्याला नेहमी दुसऱ्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो आणि स्वतःच्या भाग्याबद्दल दुर्दैव; पण स्वतःचेही भाग्य चमकवायचे असेल तर दोन गोष्टी तुमच्याजवळ हव्याच!

एक शेठजी आपल्या सुंदर सुकुमार मुलीसाठी त्यांच्या तोडीचे श्रीमंत स्थळ शोधतात आणि त्यांच्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून देतात. मात्र काही दिवसातच शेठजींचा जावई वाईट लोकांच्या संगतीत येतो आणि नशा व जुगारात पैसे उडवू लागतो. मुलीचे विवाह सौख्य हरवते. ती हतबल होते. जावई स्वतःच्याच हाताने आपल्या कुटुंबाला दारिद्रयाच्या गर्तेत ढकलतो. 

मुलीच्या आईला खूप वाईट वाटतं. एवढं चांगलं स्थळ शोधूनही मुलीच्या वाट्याला असं दुर्दैव का यावं? ती शेठजींना सांगते, तिची परिस्थिती सुधारावी म्हणून आपण तिला काही आर्थिक हातभार लावूया का? यावर शेठजी म्हणतात, प्रत्येकाची वेळ यावी लागते, ती आली की आपोआप मार्ग निघत जातात. तोवर इच्छा असूनही आपण  काहीच करू शकत नाही. 

तरी एकदा, जावई घरी आलेला असताना शेठजींना सांगून मुलीच्या आईने त्याला आर्थिक मदत करावयास भाग पाडले. थेट मदत केली तर जावयाचा अपमान होईल, तो मुलीवर राग काढेल. या काळजीने शेठजींनी आपल्या नोकरांना सांगून मोतीचूर लाडवांमध्ये सोन्याच्या मोहरा घालून मिठाईचा खोका जावयाला भेट दिला. तो घेऊन घरी जात असताना जावयाने विचार केला, मिठाई खाण्यापेक्षा ती विकली तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न तरी सुटेल. या विचाराने तो हलवायाकडे जातो आणि ती ताजी मिठाई विकून मिळालेले पैसे विकून घरी जातो. 

बाहेरची कामे आवरून शेठजी घरी परतत असताना विचार करतात, आज मुलीला लाडू खाताना आनंद होईल. या आनंदात आपणही घरी मिठाई घेऊन जाऊया. असे म्हणत शेठजी त्याच हलवायाच्या दुकानात जातात, लाडू विकत घेतात. हलवाई तोच मिठाईचा खोका पुढे करतो आणि मोबदला घेतो. शेठजी मिठाईचा खोका घेऊन घरी येतात, तर पहिल्याच घासला लाडवांबरोबर सुवर्ण मोहरा दाताखाली आलेली पाहून आश्चर्यचकित होतात. त्यांची पत्नीही गोंधळून जाते. 

यावर शेठजी म्हणतात, 'बघितलंस? आपल्या मुलीला मदत करावी अशी आपली इच्छा होती. पण तसे असूनही ती पूर्ण होऊ शकली नाही. कारण मुलीच्या नशिबात अजून प्रारब्धाचा फेरा संपलेला नव्हता. म्हणून मदत पाठवूनही ती तिच्यापर्यंत पोहोचली नाही. एवढंच काय तर एवढी चांगली संधी हलवायाच्या हाती येऊनही हुकली! याचाच अर्थ 'वक्त से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिल सकता!' 

नशिबावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपली वेळ आली की भाग्य उघडते आणि वेळ नसली की भाग्य साथ सोडते. मात्र यावर पूर्णपणे विसंबून न राहता ज्यो प्रयत्न करतो, कष्ट घेतो, संयम बाळगतो तो स्वतःचे भाग्य स्वतःच बदलतो आणि अशाच प्रयत्नवादी माणसाला देवही मदत करतो. यासाठी २ गोष्टी तुमच्याजवळ हव्या, 'सकारात्मकता आणि दृढ निश्चय! या दोन गोष्टी तुमच्याजवळ आहे का तपासून बघा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी