शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Think Positive: सहलीला जाताना होणारा आनंद ऑफिसला जाताना का टिकत नाही? त्यामागे आहे 'हे' मुख्य कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:45 PM

Think Positive: रोज अलार्म होऊनही तो बंद करून झोपणारे आपण सहलीला जाताना अलार्म वाजण्याआधी उठतो; ती जादू रोज होण्यासाठी वाचा ही गोष्ट!

रोजचे ऑफिस, रोजची शाळा, रोजचे काम यातून आपल्याला ब्रेक हवा असतो, त्यामुळे आपण कधी घरच्यांबरोबर तर कधी मित्रमैत्रिणींबरोबर तर कधी सोलो ट्रिपला जातो आणि मोकळेपणाची भरपूर ऊर्जा साठवून पुढच्या ब्रेकची वाट बघू लागतो. पण आपले रोजचेच जगणे उत्साहाचे बनवता आले तर? सहलीचा आनंद एक दिवसापुरता न राहता तो रोज उपभोगता येईल. पण कसा? ते जाणून घेण्यासाठी वाचा ही गोष्ट!

एकदा एक यात्री प्रवासाला निघाला होता. वाटेत एक घर पाहून तो काही काळ विश्रांतीसाठी थांबला. घरात एक साधू राहत होते. मात्र घर, संसाराच्या काहीच खुणा त्या घरात दिसत नव्हत्या. निदान एखादा पलंग, उशी, चादरी तरी! त्या यात्रीने साधू बाबांना विचारले, 'बाबा, तुम्ही नक्की या घरात राहता ना? मग तुमचे सामान कुठे?'

त्याला उत्तर देण्याऐवजी साधू बाबा त्याला म्हणाले, 'माझे सोड तुझा पलंग, उशी, चादर कुठे?'

तो यात्री हसून म्हणाला, 'बाबा, मी एक यात्री आहे, यात्रेत जेवढे सामान कमी तेवढा यात्रेचा आनंद जास्त!'

साधू बाबा म्हणाले, 'मी सुद्धा एक यात्रीच आहे, जेवढे सामान कमी तेवढा आनंद जास्त!"

या गोष्टीवरून लक्षात येते, की जगण्यासाठी पूरक गोष्टी मिळाल्या तरी त्यात आपण समाधानी राहू शकतो, अति सामान असो नाहीतर अति विचार असो ते ओझे आपल्याला मानवत नाही, म्हणून प्रवासापेक्षा जास्त थकवा त्या ओझ्यामुळे आपल्याला येतो. 

सहलीला जाताना शेकडो छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला न्याव्याशा वाटतात, मात्र बॅग जड होऊ लागली आणि ती आपल्यालाच पाठीवर उचलून प्रवास करायचा आहे याची कल्पना आल्यावर आपण त्याच आवश्यक गोष्टीतून अनावश्यक किंवा पुढच्या वाटेवर मिळू शकतील अशा गोष्टींचे ओझे कमी करतो आणि सुटसुटीत बॅग पॅकिंग करतो. 

रोजची ऑफिस बॅग सहलीच्या बॅगेच्या तुलनेत हलकी असते, पण सहलीला जाताना मनावरचे ओझे कमी असल्याने पाठीवरचे ओझे जड वाटत नाही. याउलट ऑफिसला जाताना पाठीवर कमी आणि मनावर विचारांचे ओझे लादून घेतलेले असते. 

अति विचार किंवा अति काळजी हे विनाकारण मनावर घेतलेले ओझे आहे. ठराविक मर्यादेपर्यंत आपण ते ओझे पेलू शकतो. मात्र ज्या क्षणी आपण ते ओझे उतरवायला शिकतो, तिथून आपला प्रवास सोपा आणि आनंददायी होतो.

त्यामुळे नोकरी असो नाहीतर शाळा, कॉलेज किंवा घरकाम, मनावर ओझे बाळगून ते करायचे नाही तर आनंदाने करायचे. रोज नवे काही शिकायचे. आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधायच्या. एकदा का ही कला अवगत झाली की आपले रोजचे जगणे सहलीसारखे उत्साहवर्धक झालेच म्हणून समजा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी