शहरं
Join us  
Trending Stories
1
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
2
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, २५ महिलांसह २७ जणांचा मृत्यू 
3
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
5
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
6
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
7
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
8
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
9
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
10
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
11
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली
12
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
13
Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार
14
मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई 
15
BREAKING : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा! BCCI ने अचानक संघ बदलला; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी
16
ऑल टाईम हाय नंतर Nifty, Sensex झाले रेंज बाऊंड; IT शेअर्स चमकले, Airtelमध्ये प्रॉफिट बुकिंग
17
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
18
'सरकारला सत्य सहन होत नाही', भाषणातील काही भाग काढून टाकल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतापले
19
"...तेव्हा का सूचलं नाही?", अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी करताच संतापल्या सुषमा अंधारे! 
20
Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

मोक्ष मिळवण्यासाठी 'हा' एक क्षण पुरेसा आहे; कसा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:46 PM

मोक्ष या संकल्पनेबद्दल आपण बरेच स्वप्नरंजन केलेले असते, पण मोक्ष शब्दाचा अर्थ आणि सोपा मार्ग जाणून घेऊया!

>> कांचन दीक्षित

निसर्ग सकारात्मक आहे,निसर्ग सतत हिलिंग करत असतो,एक क्षणभरही न थांबता! साधं काही खरचटलं आणि थोडंसं रक्त आलं तरी त्याच क्षणी बरं होण्याची प्रक्रिया सुरु होते. निसर्गाला सगळं बरं करायचंय,पुर्ण करायचंय,संतुलन साधायचंय आणि त्यासाठी तो अखंड कार्यरत आहे.जोडणं,वर्तुळ पुर्ण करणं हेच निसर्गाचं काम.

माणूस मात्र आपल्या जखमा लपवतो,तळघरात कोंडून ठेवतो कारण त्याला वेदनेला सामोरं जाण्याचं भय वाटतं.तो त्यापेक्षा सोपं काहीतरी शोधतो,वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो,स्वतःपासूनच पळतो,सुखाच्या मागे धावतो.

स्वतःला फसवतो,जखमा सुन्न करण्यात व्यस्त रहातो,मनोरंजनाचे नवनविन मार्ग शोधतो,गर्दीत रहातो,का तर एकांतात वेदना जाणवते म्हणून!हिलिंग म्हणजे शरीराला लागलेली बंदुकीची गोळी किंवा खुपसलेला बाण काढणं,Yes त्यात प्रचंड वेदना आहे,पण ती टाळण्यासाठी ती गोळी किंवा बाण तसाच राहू देणं जास्त भयानक आहे. मेंदूला फक्त वेदनेपासून पळणं माहीतीये,तो हुशार आहे त्याच्याजवळ हजारो मार्ग आहेत.तो त्याची सगळी शक्ती पणाला लावतो आणि शोधून आणतो वेदना सुन्न करण्याचे नामी उपाय!

आता निसर्ग,तो त्याचं काम सोडत नाही,अंघोळ करायला नको म्हणून सैरावैरा धावणा-या मुलाला आई बरोब्बर पकडते तसं निसर्ग आपल्याला पकडतो.कापडी पट्टयांवर आणखी पट्टया लावून झाकलेल्या,घट्ट बांधून बधीर केलेल्या वेदना,लपवलेल्या जखमा,आपली दु:खं त्याला बरी करायची आहेत,पण त्या पट्टयांनीच तर वाचवलं ना आपल्याला आत्तापर्यंत ! आपण सहजासहजी सोडणार थोडीच! आरडाओरडा,नकार,पळापळ करणारच ! मग निसर्ग आपली स्ट्रॅटेजी वापरतो,एखादा आजार,संकट,शत्रू,ट्रिगर करणारी माणसं,उधवस्त करणा-या घटना ... 

आता अडकलो ! बरीच वर्ष टाळूनही दातांच्या डाॅक्टरांच्या खुर्चीत कधीतरी बसावंच लागतं तशी वेळ !आता निसर्ग म्हणतो, किती वेळ वाया घालवलास तुझा आणि माझा ! कशाला ईतकं भोगलंस ?ही वेदना एकदाच सहन करायची होतीस,न पळता ! मग तू कधीच मुक्त झाला असतास.

एकदाच असं मरायचं की मरणातून बाहेर पडायचं,हे जमलं की मोक्ष होतो ना तसं !

आपण प्रथमच भेटतो वेदनेला,कितीही झालं तरी आपल्याच जखमा,नातंच ना एक,आपण स्विकारतो,जवळ घेतो,समजून घेतो,थोडं बोलतो,थोडं ऐकतो आणि अश्रूच्या धारांनी न्हाऊन निघतो.वेदना संपते,भीती संपते आणि विनाकारण धावत पळत थकलेला जीव विसावतो.

निसर्गाचं काम झालेलं असतं,आपण आपल्या नाकारलेल्या वेदनेला स्विकारुन बरं केलेलं असतं आणि पुर्ण संपुर्ण झालेले असतो.

मोक्ष म्हणतात तो हाच, नाही का?