शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती, त्यानिमित्त त्यांनी विवेकानंदांना सांगितलेली महाभारतातली कथा जरूर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:49 IST

दुर्योधन आपले पाप कृष्णाला अर्पण करायला निघाला होता; स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेला दृष्टांत!

स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती आहे. फाल्गुन शुक्ल द्वितीयेला त्यांचा जन्म झाला. तिथीनुसार आज म्हणजे १ मार्च रोजी त्यांची जयंती आहे. रामकृष्ण परमहंस महाकाली मातेचे परमभक्त होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्वामी विवेकानंदांना तसेच समस्त शिष्यगणांना शिकवलेला कर्मयोग आपणही समजून घेऊया. 

कर्मयोग म्हणजे कर्मातून केलेली ईश्वर सेवा. निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो. आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून ईश्वर प्राप्ती हे ध्येय ठेवून कर्मयोग आत्मसात करता येतो. त्यामुळे आपोआपच विषयातील आसक्ती कमी होऊन ईश्वर चरणी मन गुंतून राहते. 

कर्मातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. साधा विचार करणे, हे सुद्धा कर्म आहे परंतु त्या विचारात भगवंत आहे किंवा भगवंताच्या कार्याचा विचार आहे, तर तो देखील कर्मयोगच आहे. आपले प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करण्याच्या हेतूने धार्मिक विधींमध्ये शेवटी पळीभर पाणी ताम्हनात सोडून श्री कृष्णार्पणमस्तु म्हणतात. आपण जे देवाला अर्पण करतो, त्याच्या हजार पट पुण्य आपल्या पदरात पडते. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक केले पाहिजे. 

दुर्योधन आपले कुकर्म अर्थात पाप श्रीकृष्णाला अर्पण करायला निघाला होता, तेव्हा भीमाने त्या सावध करत म्हटले, तू जेवढी पापं कृष्णाच्या चरणी वाहशील त्याच्या हजार पट  पाप तुझ्या माथ्यावर चढेल. त्याचप्रमाणे आपणही भगवंताच्या चरणी चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगले योगदानच अर्पण केले पाहिजे, तरच हजार पट पुण्य आपल्या पदरात पडेल. 

प्रेम करायचेच असेल तर भगवंतावर करा. एकदा का त्याच्या प्रति आसक्ती निर्माण झाली, की अन्य भौतिक सुखांची गोडी वाटणार नाही. ती सुखं क्षणभंगुर आहेत, हे जाणवत राहील आणि तुम्ही कर्मयोगापासून कधीच दूर होणार नाही. आपले काम प्रामाणिकपणे करणे आणि भगवंताला साक्ष ठेवून करणे हा खरा भक्तियोग!

रामकृष्ण परमहंस यांचे सुंदर विचार आचरणात आणून स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचा आणि साऱ्यांचा जसा उत्कर्ष केला, तसा आपणही आपल्या आयुष्यात कर्मयोग अंगिकारण्याचा प्रयत्न करूया. 

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदMahabharatमहाभारत