शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
5
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
6
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
7
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
8
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
9
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

खजिना कधीही कोणालाही मिळू शकतो, फक्त तो ओळखता आला पाहिजे; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:52 PM

संपत्ती मिळाली तर कोण नाही म्हणेल? पण ती नेमकी कुठे आणि कशी शोधायची हे सांगणारी व्यक्ती सापडली पाहिजे!

वाडवडिलांची पुण्याई वंशजांच्या कामी येते. ही पुण्याई कधी प्रतिष्ठेची असते, तर कधी मान सन्मानाची, तर कधी आर्थिक स्वरूपाची किंवा अनुभवाची! आजही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून अनेक गोष्टी वारसाहक्काने मिळतात. परंतु, हक्क म्हटल्यावर अधिकार आला आणि अधिकार मिळवताना कर्तव्याची जाणीव नसेल तर काय उपयोग? यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला सांगितला पुढील उपाय...!

एक शेतकरी होता. अतिशय मेहनती होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर घरसंसार चालवला होता. मुलाचे पालनपोषण केले. शिकवले, वाढवले आणि आता त्याने घराची जबाबदारी स्वीकारावी असे त्याला सांगितले. परंतु, मुलगा अतिशय आळशी होता.

मुलाने आजवर वडिलांची मेहनत पाहिली होती. परंतु त्याची कष्ट करायची अजिबात तयारी नव्हती. त्याला नेहमी अचानक धनलाभ झाल्याचे स्वप्न पडत असे. 

एक दिवस तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही शेतीत कष्ट घेण्यापेक्षा व्यापार केला असता, तर आज मला कष्ट करावेच लागले नसते. वारसाहक्काने तुमची कमाई मला मिळाली असती. खजिना मिळाला असता. पण नाही. तुम्ही स्वत: कष्ट केले आणि आता मलाही कष्ट करायला भाग पाडत आहात. 

यावर शेतकरी म्हणाला, `बाळा, खजिन्याचे काय घेऊन बसलास, तो तर तुला मी आताही देऊ शकतो. जो मला माझ्या वडिलांनी दिला होता. आता तो मी तुला देतो.'

मुलगा सुखावला. कानाचे द्रोण करून वडिलांचे शब्द ऐकू लागला. शेतकऱ्याने त्याला एक ठिकाण सांगितले. तिथे एक डोंगर आहे आणि डोंगरावर एक देऊळ आहे. त्याच्या मागच्या बाजूला धनाची पेटी पुरलेली आहे.

हे शब्द ऐकले आणि मुलाला एवढे स्फुरण चढले की आनंदाच्या भरात तो निघालासुद्धा! मनातल्या मनात तो भविष्याची स्वप्न रंगवू लागला. परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला एवढी मेहनत घ्यावी लागली, की खजिन्याचा विचारच त्याच्या डोक्यातून निघून गेला. डोंगरावर पोहोचणे हेच त्याचे ध्येय बनले. 

वाटेत त्याला अनेक लोक भेटले. त्यांची मदत घेत घेत तो प्रवास करत होता. वळचणीचे पैसे संपले. वाटेत मिळेल ते काम पत्करून त्याने थोडीफार कमाई केली. तो अनुभव त्याला बरेच काही शिकवून गेला. मजल दरमजल करत तो डोंगरावर पोहोचला. देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या पाठीमागे पोहोचला. तिथे जाऊन मागचा सबंध परिसर पाहून तो देहभान विसरला. एवढे निसर्गसौंदर्य त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. आपल्या वडिलांनी सांगितला, तो खजिना बहुदा हाच असावा.

खजिन्याच्या शोधात निघालेल्या मुलाला लोकसंग्रह, स्वमेहेनत, निसर्गासौंदर्य आणि बदललेला दृष्टीकोन अशी अनुभवाने भरलेली खजिन्याची पेटी सापडली. मुलाने परत येऊन वडिलांचे आभार मानले. कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि भविष्यात आपल्या मुलालाही हा खजिना द्यायचा, असे त्याने ठरवून टाकले.