शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

दारिद्रय, गैरसमज, आजारपण, कलह यावर उपनिषदात दिलेला तोडगा वापरून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 5:14 PM

वैदिक मंत्रावर पूर्ण विश्वास असेल व तसा ईश्वरी संकल्प असेल तर त्याचा जरूर अनुभव येतो.

सद्यस्थितीत घराघरात कली शिरलेला आहे. खऱ्या अर्थाने कलियुग सुरू झाले आहे. कोणीही कोणाला जुमानत नाही, कोणी  कोणाची काळजी करत नाही, मन जपत नाही, नाती जपत नाही. अशामुळे दारिद्रय , गैरसमज, आजारपण, कलह यांमुळे अनेक संसार अस्वस्थ स्थितीतून जात आहेत. अनेकांच्या सुखाची हानी होत आहे. यावर उपाय म्हणून उपनिषदात एक मंत्र आहे. त्याची मनोभावे उपासना करावी आणि प्रत्यय घ्यावा. 

खरे पाहता, ईश्वरी सत्ता प्रमाण मानून भगवंत ज्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीत संतोष मानणे हाच एक मुख्य तोडगा आहे. परंतु आपले तेवढ्यावर समाधान होत नाही. यासाठी उपनिषदात दिलेल्या तोडग्याची आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी. तोडग्यावर पूर्ण विश्वास असेल व तसा ईश्वरी संकल्प असेल तर त्याचा जरूर अनुभव येतो. लेखक अ.ल.भागवत यांनी परम सुखाचे रहस्य या पुस्तकात हा तोडगा दिला आहे.

उपनिषदे ही ईश्वरी वाचा असल्यामुळे त्या मंत्रातील अर्थ अनुभवाला येणे यथान्याय आहे. या उपासनेसाठी कसलेच अवडंबर नाही. काहीही खर्च नाही. जागेचे बंधन नाही. सकाळी उठून नित्याप्रमाणे स्नान करावे. आपले आन्हिक संपवावे. नंतर डोळे मिटून घ्यावेत व खालील उपनिषद मंत्र मनातल्या मनात २७ वेळा म्हणावा. 

श्लोक स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।।ऊँ शांति: शांति: शांति:।

अर्थ : महान कीर्तिमान इन्द्र माझे कल्याण करो, परम धनवान पूषा माझे कल्याण करो, अरिष्टांचा नाश करण्यासाठी चक्ररूप गरुड माझे कल्याण करो. माझ्या त्रिविध तापाची शांती होवा़े 

जसजसा मंत्रजप वाढत जाईल त्या प्रमाणात जीवनाला मांगल्य व स्थैर्य प्राप्त होईल. यंत्रे पूजण्यापेक्षा हा वैदिक मंत्र तुमचे कल्याण करण्यास समर्थ आहे. मंत्रजपकाळी मोठ्या आनंदात राहावे. सर्व चिंता काळजी भगवंतावर सोपवून निर्धास्तपणे जीवन जगावे. 

वैदिक मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपले ऋषी मुनी त्या मंत्र सामर्थ्याने वाईट शक्तींवर विजय मिळवत असत. परंतु सद्यस्थितीत आपल्या प्राचीन ग्रंथांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि आपणच आपल्या बहुमूल्य साहित्यावर शंका उपस्थित करत असल्यामुळे सकारात्मक लहरींचे प्रमाण कमी होत चालले आहे. याउलट परदेशातील लोक वेद वांङमय अनुवादित करून त्यांचा अभ्यास करत आहेत व लाभ घेत आहेत. गरज आहे ती आपण आपल्या प्राचीन संस्कृतीकडे डोळसपणे पाहण्याची आणि जाणीवपूर्वक अभ्यासण्याची!