शहरं
Join us  
Trending Stories
1
Abandoned matches in Test Cricket, AFG vs NZ: अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी रद्द! भारतात कसोटी क्रिकेट इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं!
2
तुमच्या वाहनावरील दंड माफ करायचाय? मग नॅशनल लोक अदालतीला भेट द्या; प्रक्रिया समजून घ्या
3
महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 
4
यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज बंपर तेजी; घेण्यापूर्वी चेक करा लेस्ट दर
6
महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील
8
३ ग्रहांचे ३ राजयोग: १० राशींना फायदा, संचित संपत्तीत वाढ; नवीन नोकरीची संधी, पद-पैसा-लाभ!
9
"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा
10
अब तक १,०००,०००,०००! एवढे 'फॉलोअर्स' कमावणारा रोनाल्डो जगातील पहिला अन् एकमेव माणूस
11
एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला!
12
एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे
13
P N Gadgil ज्वेलर्सच्या IPO ला तुफान प्रतिसाद, आयपीओ लागला का नाही? 'असं' करा चेक
14
पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाइल मोहिमेला जबर धक्का; अमेरिकेने सप्लायर्सवर घातली बंदी
15
"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले
16
मुलगी म्हणून मी कमी पडले! अंकिता वालावलकर भावुक, म्हणते-"शाडुच्या मातीची २-३ फूट मूर्ती उचलणं मला..."
17
Aadhaar Card Update : तुमचं Aadhaar Card १० वर्ष जुनं आहे? त्वरित करा मोफत अपडेट; राहिलेत अखेरचे २ दिवस
18
रायबरेलीतल्या सलून चालक अन् मोचीला राहुल गांधींचं रिटर्न गिफ्ट; दोघेही झाले खुश
19
'अरे'ला 'का रे' करायला हवं, त्यांना तीच भाषा कळते; सुनील गावसकर का, कुणावर चिडले?... वाचा!
20
ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती

Tulasi Vivah 2022 : तुळशी मातेचा विवाह विश्वंभर कृष्णाशी लावून देण्यामागे काय आहे नेमके कारण? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 12:37 PM

Tulasi Vivah 2022: श्रीकृष्णाला तुळशी प्रिय आहे, हे एकमेव कारण तुळशी विवाहामागे नाही, तर त्यामागे केलेला वैश्विक विचारही जाणून घ्या!

लग्नाच्या गाठी स्वर्गात बनातात, असे म्हटले जाते. त्या जेव्हा जुळायच्या, जिथे जुळायच्या, जशा जुळायच्या, त्या तशाच जुळतात. त्यांच्या आड कोणी येऊ शकत नाही. त्यातही लग्न जेव्हा खुद्द देवी देवतांचे असते, तेव्हा त्या लग्नाचा साज बाज नक्कीच निराळा असणार, हो ना? घराघरात तुळशी विवाहाची तयारी झाली असेल. कारण ५ ते ८ नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह सोहळा रंगणार आहे. आणि या सोहळ्याला २५-५० जणांची उपस्थिती नसून ३३ कोटी देवदेवतांची असणार आहे. कारण, हा विवाह साधासुधा नसून तो तुळशी आणि श्रीकृष्णाचा विवाह असणार आहे. खुद्द भगवान विष्णूंचे जावई म्हणून स्वागत करायचे, तर आपल्याकडून लग्नाची पूर्ण तयारी नको का?

अखिल विश्वाचा पालनकर्ता श्रीकृष्ण अर्थात भगवान महाविष्णू चातुर्मासाची विश्रांती संपवून उठतात आणि लागलीच, सर्व भक्तगण त्यांचा विवाह लावून देतात. भक्ताचा हा भोळा भाव पाहून भगवंतही या विवाहाचा मनापासून स्वीकार करतात. विष्णूंची सर्वात प्रिय, पवित्र, पावन असलेली तुळशी, जिला हरिप्रिया असेही म्हणतात, तिच्याशी विवाह लावून देतात. भगवान विष्णू आणि तुळशी माता भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते, ती वर्षभर साखरपुडा, लग्न, मुंज, वास्तू, गृहप्रवेश इ रूपात सुरूच असते. 

तुळशीचा लग्नसोहळा घरातील लग्न सोहळ्याप्रमाणे मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो. फरक एवढाच, की हे लग्न कार्यालयात न लागता, घरच्या घरी किंवा गावाकडे अंगणात, मंदिरात पार पडते. मात्र, सर्व आप्तेष्ठांची त्या लग्नाला उपस्थिती असते. लग्नविधी, अंतरपाट, मुंडावळ्या, अक्षता, मंगलाष्टक अशा थाटात लग्न पार पडते.

भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे, हा विचारच किती सुखद आहे. या सोहळ्याचे वर्णन करताना संत नरसी मेहता श्रीकृष्णाला सांगतात, येताना एकटा येऊ नकोस, तर तुझ्याबरोबर सर्वांना घेऊन ये. आजवर भक्तांवर आलेल्या बिकट प्रसंगाच्या वेळी एकटा धावून गेला आहेस, आता तर तुझेच लग्न लावून देतोय, मग तर तू वाजत गाजत आलेच पाहिजेस...

घेऊनि सकळाला, श्रीपती यावे लग्नाला,अर्पूनि सुवर्णनगराला, दिधले बहुसुख मित्राला, स्मरूनि भक्तीला, पुरविली वस्त्रे भगिनीला,प्रपंच खटपट वाहूनी चरणाला, श्रीपती यावे लग्नाला।

भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि `तुलसी माता' या नात्याने तिचे पूजन करते. समाजातून रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो, तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू . पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे. या गोष्टीचे आपल्याला भान यावे, म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा मंडप उसाच्या झाडांनी बनवण्यात येतो. उसासारखे रसमय जीवन असेल म्हणजे तारुण्यात प्रभुकार्य करता आले, तरच प्रभुच्या मिलनाची शक्यता राहू शकते. तर तुम्ही पण करताय ना त्यांच्या लग्नाची तयारी ?