शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

विजया एकादशी: ‘या’ श्लोकातून उलगडले शेषशायी विष्णूंचे रहस्य; भावार्थ समजून घ्या, रोज म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 1:10 PM

Vijaya Ekadashi 2024: काही श्लोक आपण दररोज म्हणतो. मात्र, त्याचा अर्थ काय असतो, ते आपल्याला माहिती असतेच, असे नाही. जाणून घ्या...

Vijaya Ekadashi 2024: माघ महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. रामायणात प्रभू श्रीरामांनी या एकादशीचे व्रत केले होते, अशी मान्यता आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. या दिवशी श्रीविष्णूंचे विविध श्लोक, स्तोत्रे, मंत्र पठण, जप आवर्जून केला जातो. 

०६ मार्च रोजी विजया एकादशी आहे. काही श्लोक आपल्या रोजच्या म्हणण्यातील असतात. अगदी लहानपणापासून आपण काही श्लोक नित्यनेमाने म्हणत असतो. मात्र, अनेकदा श्लोकाच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. केवळ तोंडपाठ असतात म्हणून आणि सवयीचा भाग म्हणून ते म्हटले जात असतात. तसाच हा भगवान महाविष्णूंची स्तुती आणि वैशिष्ट्ये सांगणारा हा श्लोक आपण रोज म्हणतो. विजया एकादशी निमित्त या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ.

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्,  विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम् शुभांगम्।लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानिगम्यम्,  वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं।।  

दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार करण्यासाठी गर्दीला मार्ग दाखवायला मार्गदर्शक लागतोच. मोहिमेची अंमलबजावणी करायला नेता लागतोच. शत्रूशी दोन हात करायला सेनापती लागतोच, तसाच आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु लागतोच. या सर्व भूमिका एकत्रपणे एकहाती सांभाळणारे कुशल दैवत म्हणजे, भगवान महाविष्णू! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष या श्लोकात वर्णन केले आहेत. कोणत्याही समूहाचे, कार्याचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याकडे, नायकाकडे हे गुण असले पाहिजेत. भगवान महाविष्णूंना आपले आदर्श मानले पाहिजे, असे म्हटले जाते. 

श्लोकाचा भावार्थ काय?

- शांताकारं: व्यक्ती नुसती शांत असून उपयोगी नाही. अनेकदा वरवर शांत दिसणारी व्यक्ती आतून धुमसत असते. अस्वस्थ असते, चरफडत असते. कारण, अशी व्यक्ती स्फोटक ठरू शकते. व्यक्ती केवळ शांत 'दिसून' उपयोगी नाही, तर ती अंतर्बाह्य 'शांत'ही असावी लागते. शांत डोक्याची व्यक्तीच कठीणात कठीण परिस्थिती नियंत्रणात आणू शकते.   

- भुजगशयनम्: शांत कोणीही बसेल, पण भुजंगाची शय्या, म्हणजे फारच झाले. घरात छोटसे फुरसे आढळले, तरी लोक दहा आकडी सापडल्याचे वर्णन करून रंगवून सांगितले जाते. सर्पमित्र येऊन भोवऱ्याची दोरी पकडावी, तसे अलगद उलचून घेऊनही जातात. इथे तर शेषराजांवर स्वार होऊन भगवंत कृष्णावतारात नाचत आहेत, विष्णू अवतारात झोपत आहेत. या प्रतिकात्मक रूपकातून महाविष्णूंनी दाखवून दिले आहे की, संकट कितीही मोठे असो, ते गुंडाळून त्यावर स्वार होता आले पाहिजे. संकटकाळातही सहजतेने आयुष्य जगता आले पाहिजे. तरच तुम्ही इतरांना धीर देऊ शकाल. नायकाने घाबरून, डगमगून चालत नाही. तो स्थिर असला, तरच त्याचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार आहेत. आणि नायकाचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे, पद्मनाभं सुरेशम्!

- विश्वाधारम् गगनसदृशम्: या अखिल विश्वावर आजवर एवढी संकटे आली, त्यांचा निभाव लावताना विष्णू डळमळीत झाले नाहीत, उलट त्यांनी विश्वाला आधार दिला म्हणून त्यांना जगद्पालक अशी बिरुदावली मिळाली. पृथ्वीच्या टोकावर कुठेही गेलात, तरी विस्तीर्ण आकाश जसे आपली साथ सोडत नाही, तसे सर्वव्यापक भगवान महाविष्णू गगनसदृश्य आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्या पाठीशी आहेत. 

- मेघवर्णम् शुभांगम्: मेघांसारखी त्यांची श्यामल कांती आहे आणि मेघाप्रमाणेच प्रेमाचा वर्षाव करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांना पाहून कोणालाही आनंदच होईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून त्यांना शुभांगम् म्हटले आहे. 

- लक्ष्मीकांतं कमलनयनम्: शब्दश: ज्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरते, असे महाविष्णू कामे थांबवून निष्क्रिय झालेले नाहीत, तर त्यांनी जगराहाटीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. आपल्या कमलनयनांनी, कृपादृष्टीने ते जगाकडे पाहत आहेत. कमलनेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सकारात्मक दृष्टीकोन. कमळ चिखलात उगवते, तरीही सुंदर, टवटवीत असते. चिखलात राहूनही, स्वत:ला डाग लावून न घेता आपले आयुष्य आनंदाने जगते. तसेच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला संकटातही संधी शोधून सकारात्मक दृष्टीकोन देता आला पाहिजे. 

अशा भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी योगी, तपस्वी, ऋषी, मुनी, भाविक सदैव धडपडत असतात. योगिभिर्ध्यानिगम्यम्. भगवान महाविष्णू केवळ शूर, साहसी आणि सत्याची कास धरणाऱ्या व्यक्तीलाच साथ देतात. म्हणून आपणही त्यांच्या कृपेस पात्र होऊया. साऱ्या विश्वावर कोणतेही संकट आले, तरी ते पार करण्यासाठी लागणारे धैर्य मागुया व या विश्वाचे कल्याण होवो, हे दान पदरात पाडून घेऊया, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. 

नेपाळमध्ये आहे शेषशायी विष्णूचे मंदिर

नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या शिवपुरी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तलहटी या गावात शेषशायी विष्णूचे मंदिर आहे. मंदिराच्या वैशिष्ट्यामुळे जगभरातील भाविक, पर्यटक येथे आवर्जुन येत असतात. या मंदिरातील विष्णूंची मूर्ती भव्य आहे. ११ नागांच्या शेषशैय्येवर विराजमान ही मूर्ती रहस्यमय आहे. शेषशैय्येवरील श्रीविष्णू एका पाय दुसऱ्या पायावर ठेवून निद्रावस्थेत आहेत. ११ नाग श्रीविष्णूंचे छत्र बनले आहेत. या मंदिरात श्रीहरि म्हणजेच श्रीविष्णूंसोबत महादेव शिवशंकर विराजमान आहेत.

 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक