शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

प्रबोधिनी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे मंदिरात जाऊन घ्या काकड आरतीचा प्रासादिक अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 12:34 IST

२३-२७ नोव्हेंबर विठुरायासमोर काकड आरती म्हणण्याचा सुखद अनुभव घ्या आणि या आरतीचे महत्त्वही जाणून घ्या. 

रोज सकाळी, दुरून कुठल्यातरी मंदिरातला घंटानाद आपल्या कानावर पडत असेल. तो घंटानाद आहे, काकड आरतीचा. मुख्यत्त्वे कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकड आरती सुरू असते. काकड आरतीच्या वेळी काकड्याने (वातीचा एक प्रकार) देवाला ओवाळले जाते, म्हणून या आरतीला काकड आरती म्हणतात. पहाटेची झोप मोडून काकड आरतीत एकदा सहभागी होऊन बघा. तो आनंद अवर्णीय आणि शब्दातीत असतो. मंगल पहाटे घंटेचा नाद, धुक्याची चादर, उद धुपाचा सुवास आणि त्यात भगवंताची मोहक मूर्ती! एकदा तरी अनुभूती घ्याच! काकड आरतीची अनेक काव्ये प्रचलित आहेत. जसे की,

सत्व रज तमात्मक केला काकडा,भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतवला।

या दोन ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ, आत्मिक संवाद आणि भक्ती प्रगट होते. म्हणून आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक. आरती म्हणजे तबकात अथवा ताम्हणात निरांजनातील दीप प्रज्वलीत करून देवाला ओवाळणे. ही ओवाळणी काव्यपदातून  एका विशिष्ट चालीने म्हटली जाते. या पदामध्ये साधक ईश्वराच्या रूपाचे, पराक्रमाचे, कर्तृत्वाचे वर्णन करीत असतो. विशेषत: यात देवाची स्तुती असते. आरतीमुळे उपासकांना कृतार्थतेची जाणीव होते. तो देहभान विसरून परमेश्वराला शरण येतो. यासाठी साधकांनी आरत्यांचे आत्मविष्कार साधण्यासाठी विविध प्रकार केले आहेत ते असे- काकड आरती, धुपारती, दीपारती, पंचारती, शेजारती

काकड आरती - साधक दिवसाच्या प्रारंभी पहाटेच्या वेळी परमेश्वराची आळवणी करतो, त्याला काकड आरती म्हणतात. या उपचारातून साधकाची ईश्वराविषयीची निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त होत असते. तसेच जीवनाची नित्यकर्मे तो ईश्वराला अर्पण करतो. अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमापर्यंत मंदिरातून काकड आरती केली जाते. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती, स्तोत्रे म्हटली जातात. संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, संत एकनाथ आदि संतांनी केलेल्या रचना काकड आरतीनंतर गायल्या जातात.

धुपारती - धुपाने मंदिरात तसेच घरातील देव्हाऱ्यात देवाला ओवाळले जाते, त्या आरतीला धुपारती असे म्हणतात. सत्व, रज, तम हे त्रिगुण नाहीसे होऊन मनुष्याने गुणातीत व्हावे ही भावना या आरतीमागे असते. शिवाय धुपाचा वास सर्वत्र दरवळल्यामुळे त्या वासातून देवाचे अस्तित्व भासू लागते. 

दीपारती - साधक निरांजनाने देवाला ओवाळतो त्या निरांजनातील दिव्याचे तेज तो आपल्या डोळ्यात साठवत असतो. तेज हे देवाचे प्रतिक असल्यामुळे ही आरती केली असता साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.

पंचारती - पाच वातीचे एक उपकरण असते. त्यात फुलवाती लावल्या जातात. त्यानेच साधक आपले पंचप्राण ओतून देवाला ओवाळीत असतो किंबहुना आपले प्राण देवाला समर्पण करण्याची तयारी असते विशेष म्हणजे या आरतीमुळे साधक ज्योतीस्वरूपाने देवाच्या शुद्ध प्रेमाची अनुभुति घेतो. 

शेजारती - हा दिवसातील शेवटचा उपचार असून तो रात्री केला जातो. तसे पाहता देव हा सदैव जागृत असताना शेजारती करण्याचे कारण देव हा आनंदरूपी शेजेवर आहे, याचा अनुभव आपल्याला यावा हा भाव यात असतो. द्वैत स्थिती संपून अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी म्हणजेच देव व भक्त यांचे मीलन व्हावे यासाठी या आरतीचे प्रयोजन केले जाते. अशा रीतीने सकाळ संध्याकाळ व रात्रौ देवाची आरती केल्यानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालणे अगत्याचे आहे. 

प्रदक्षिणा - देवाभोवती भ्रमण करणे म्हणजे प्रदक्षिणा होय. या प्रदक्षिणेत एक सूत्र आहे ते असे की देवाच्या उजव्या बाजूने परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. याचे कारण असे की दैवी शक्ती ही मंत्राधिन असून तिचे तेजोवलय दक्षिणेकडे जात असते. प्रदक्षिणेच्या वेळी हे तेज नकळत भक्ताच्या शरीरात शिरते. त्यामुळे त्याचे मन पवित्र होऊन ते एकाग्रतेने देवासंबंधी विचार करते. म्हणजे देवाशिवाय अन्य विचार मनात देत नाहीत. थोडक्यात प्रदक्षिणा घालताना साधक देवाशी एकरूप होतो. अर्थात याला शंकराची प्रदक्षिणा अपवाद आहे. ती प्रदशिक्षणा अर्धी घातली जाते, तिला सोमसूत्री असे म्हणतात. कमीत कमी एकवीस वेळा प्रदक्षिणा घालण्याचा रिवाज आहे. यामुळे चालण्याचाही व्यायाम होतो. अशा रितीने देवपूजेचे सर्व सोपस्कार झाल्यानंतर देवाला नैवेद्य समर्पण करतात. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३