शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोत्याची अंगठी वापरताय? मग तुम्हीदेखील निश्चितच अनुभवले असतील 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:28 IST

मोती या रत्नात आपली इच्छापूर्ती करण्याची क्षमता असते, म्हणून मोत्याच्या अंगठीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

प्रत्येकाला सोने-चांदी-हिऱ्याचेच दागिने भुरळ घालतात असे नाही. तर काही जणांना राजेशाही थाट दर्शवणारे मोत्याचे दागिने जास्त प्रिय असतात. त्यातही मोत्याच्या अंगठीला तर सर्वात जास्त मान असतो. कारण, आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्याचे सामर्थ्य मोत्याच्या अंगठीत असते. मोती असे एक रत्न आहे, जे चिंतामणी प्रमाणे कार्य करते. अर्थात आयष्यातील चिंता दूर करते. संकटाच्या अनेक प्रसंगांना शांतपणे सामोरे जाण्यासाठी मोत्याची अंगठी वापरा असा ज्योतिषाकडून सल्ला दिला जातो. मोत्याची शीतलता आपल्या स्वभावात उतरावी, ही त्यामागील भावना असते. शिवाय या रत्नात आपली इच्छापूर्ती करण्याची क्षमता असते, म्हणून मोत्याच्या अंगठीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या अंगठीच्या वापरामुळे कोणकोणते लाभ होतात, जाणून घेऊया. 

जर कौटुंबिक कलह तुमच्या आयुष्यात पाठलाग सोडत नसेल आणि पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी पती- पत्नी यांच्यापैकी एकाने मोत्याची अंगठी वापरावी. त्याचा नक्की लाभ होईल आणि घरात शांती व समृद्धी राहील.

आपल्या मुलांचे आरोग्य ठीक नसल्यास, मुलांचे चित्त स्थिर नसल्यास मोती हे रत्न मानसिक आरोग्यावर रामबाण उपाय ठरते. परंतु मुलांकडून अंगठी गहाळ होण्याची भीती असल्याने त्यांना गळ्यातल्या दोऱ्यात मोती घालून द्यावा. 

योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने आयुष्यात अनेक चुका घडतात. परंतु तुम्हाला जर निर्णय क्षमतेत अभाव आहे असे वाटत असेल, तर गणपती बाप्पाला मोत्याची कंठी घालावी आणि दररोज मंगळवारी गणपती स्तोत्राचे पठण करावे. त्याचा खूप फायदा होईल आणि संभ्रमाची परिस्थिती संपेल.

आयुष्यात रोजगार असूनही, पैशाची कमतरता असते आणि त्यामुळे व्यक्ती नेहमीच त्रस्त असते, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने देवघरात कोणत्याही धान्याची रास मांडून त्यावर पिवळ्या कापडात २ मणी बांधून ठेवावे. लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय सुचवला जातो आणि अनेकांना त्याचा लाभदेखील होतो. 

अनेक जण स्वभावाने चांगले पण शीघ्रकोपी असतात. आपल्या रागामुळे ते स्वतःचेच नुकसान करून घेतात. अशा लोकांसाठी मोत्याची अंगठी खूप फायदेशीर ठरते. शिवाय त्यांनी आपल्या देवघरात धान्याची राशी मांडून पांढऱ्या कापडात शुभ्र मणी गुंडाळून ठेवावा. त्या उपायाने मन शांत होईल व रागावर नियंत्रण मिळवता येईल. 

जेव्हा अथक प्रयत्नांनंतरही एखादी व्यक्ती व्यावसायिक कारकीर्दीत प्रगती करू शकत नाही, अशा व्यक्तीने मोत्याची चांदीचे कोंदण असलेली अंगठी घालावी. त्यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीची दारे खुली होतील. 

काही घरांमध्ये सतत आजारपण असते. विशेषतः जेव्हा त्या घरातल्या स्त्रिया, वृद्ध किंवा मुले आजारी पडतात तेव्हा ही समस्या आणखीनच वाढत जाते. अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या राशीवर मोती ठेवून तो पूजा झाल्यावर दान करावा. त्यामुळे घरातून आजार दूर होतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.