शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
2
मुंबईसह राज्यातील अतिवृष्टीचा CM शिंदेंनी घेतला आढावा; म्हणाले, “नागरिकांनी सहकार्य करावे”
3
अंगावर काटा आणणारी घटना; लोकल पकडताना महिला पाय घसरून रुळावर पडली अन्...
4
"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस
5
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT, IMPS आणि RTGS कोण सर्वात वेगवान; किती लागतं शुल्क?
6
घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, बाय रेटिंगसह मोठं टार्गेट; कोणते आहेत हे शेअर्स?
7
“आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, पण आता मुंबईला वाली राहिला नाही”; अंबादास दानवेंची टीका
8
"४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर ...", शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा
9
“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले
10
पाकिस्तानच्या शेअर बाजाराच्या इमारतीला आग; ८०००० च्या उच्चांकावर असताना व्यवहार केले बंद
11
PHOTOS : स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडने चाहत्यांना खुशखबर दिली; कपलने केक कापून आनंद साजरा केला
12
केळी + दूध = आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे का आहे बॅड कॉम्बिनेशन?
13
विश्वविजेत्या Team India ला मिळालेल्या बक्षिसाचे 'भारी' वाटप; इतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ!
14
Rakhi Sawant : राखी सावंत आता कधीच होऊ शकत नाही आई! म्हणाली - "आतून खूप वेदना आहेत पण..."
15
मुसळधार पावसात On Duty असलेल्या मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा कडक Salute! शेअर केला सेल्फी
16
मुंबईवर एवढा पाऊस का कोसळला? जे सिंधुदूर्ग, रत्नागिरीत घडले, तेच... हवामान विभागाने कारण सांगितले
17
'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता
18
एकच साप सहा वेळा चावला, पिच्छा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...
19
मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
20
“तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?

स्वर्ग आणि नरक यातला फरक काय? जाणून घ्यायचाय, मग वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 10:55 AM

स्वर्ग चांगल्या कृतींनी तयार होतो, तर नरक वाईट कृतींनी तयार होतो.

एक आजी होती. ती एकटीच राहत होती. तिने आयुष्यभर अपार कष्ट केले होते. मृत्यूनंतर पुन्हा जन्ममरणाचा फेर नको, मोक्ष हवा, अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करत असे. तिची स्वर्गप्राप्तीची तीव्र ईच्छा होती. ते पाहून एक दिवस खुद्द देव वेषांतर करून तिच्या भेटीस आले आणि आजीशी बोलू लागले.बोलण्याच्या ओघात आजीने आपली स्वर्गप्राप्तीची ईच्छाही बोलून दाखवली. त्यावर वेषांतर करून आलेले देव म्हणाले, `त्यासाठी मृत्यूची गरज काय? स्वर्ग तर जिवंतपणीदेखील पाहता येतो!'

हे ऐकून आजी मोहरली. `खरंच की काय? तसे असेल तर मलाही स्वर्ग बघायचा आहे. देवाने आजीला आपल्या बरोबर नेले. एक मोठे प्रशस्त सभागृह होते. परीकथेतले चित्र वाटावे, असे भव्य आलिशान सभागृह पाहून आजीचे डोळे विस्फारले. आजी कुतुहलाने तो नजारा पाहत होती. तिथे एका दालनात जेवणाची सोय केली होती. स्वर्गातली भोजनव्यवस्था पाहण्यासाठी आजी उत्सुक होती. त्या दालनात तिने प्रवेश केला, तर तिथे तिला विचित्र गोष्टी आढळल्या. तिथे प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी भांडत होता, हाणामारी करत होता, अपशब्द उच्चारत होता. ते पाहून आजीचा भ्रमनिरास झाला. 

मग देवाने आजीला दुसऱ्या दालनात नेले. ते दालन तिथल्या भव्य वास्तुला शोभतही नव्हते. कारण सर्वसाधारण घरांमधले चित्र तिथे दिसत होते. परंतु तिथल्या लोकांचे चेहरे समाधानाने तृप्त होते. लोक हक्कासाठी नाही, तर कर्तव्यासाठी धडपडत होती. एकमेकांना मदत करत होती. त्यांना पाहून आजीच्या तोंडून नकळत निघून गेले, हा खरा स्वर्ग!

आजीचे हे उद्गार ऐकून देवाने आपल्या मूळ रूपात आजीला दर्शन देत म्हटले, `स्वर्ग आणि नरक यातला खरा भेद तुला कळला. स्वर्ग ही आलिशान वास्तू नसून स्वर्ग ही आपण निर्माण केलेली जागा आहे. स्वर्ग या शब्दाची व्युत्पत्ती आहे, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे आकाश, आपण स्वत: निर्माण केलेले आकाश, ज्याला आदि नाही आणि अंत नाही. जे विस्तीर्ण आहे. ज्यात सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे. असा स्वर्ग आपण मरणोत्तर नाही, तर जिवंतपणी निर्माण करू शकतो. आपल्या स्वभावाने, कर्तृत्त्वाने, चांगुलपणाने आपण स्वत:साठी आणि इतरांसाठी स्वर्ग निर्माण करू शकतो.'

हे ऐकून आजी म्हणाली, 'मग देवा नरक म्हणजे काय?'देव म्हणाले, 'नरक शब्दातच त्याचे उत्तर आहे, नराने निर्माण केलेले. फक्त फरक एवढाच, की स्वर्ग चांगल्या कृतींनी तयार होतो, तर नरक वाईट कृतींनी तयार होतो. तुम्ही मानवाने सद्यस्थितीत निसर्गाची केलेली हानी, रोगराई, प्रदुषण, लोकसंख्यावाढ या गोष्टी नरक आहेत. तुम्ही नरकात जगत आहात. परंतु, काही लोकांच्या चांगुलपणामुळे पृथ्वीवर स्वर्गनिर्मिती होऊन लोकांचे जगणे सुसह्य होत आहे. म्हणून मृत्यूनंतरच्या स्वर्ग-नरकाची कल्पना सोडा आणि वास्तवात नरक असलेल्या जागी स्वर्ग कसा निर्माण करता येईल, याचा विचार करा!'