शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जेव्हा मदतीचे सगळे दोर तुटतात, तेव्हाच लढण्याची जिद्द बळावते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:57 IST

भावनिक प्रसंगी कमकुवत न होता, काहीही न झाल्यासारखे उठा आणि सज्ज व्हा.

लहान मुलांची एक गंमत माहितीये का? ते जेव्हा पडतात, तेव्हा ते सभोवताली बघतात, कोणी त्यांना पडताना पाहिले, तर रडारड करतात नाहीतर आपण आपले उठून खेळायला लागतात. मोठ्या माणसांच्या बाबतीतही तेच घडते. दुःख सहन करण्याची क्षमता प्रत्येकात असते, पण कोणी सांत्वन करू लागले की आपण जास्तच रडू लागतो. म्हणून भावनिक प्रसंगी कमकुवत न होता, काहीही न झाल्यासारखे उठा आणि सज्ज व्हा. अगदी या कथेतल्या राजासारखे!

दोन देशांमध्ये युद्ध छेडले गेले होते. चहू बाजूंनी आक्रमण होत होते. प्रजेला नुकसान नको, म्हणून अपयशी होत चाललेला राजा आपल्या सैन्याला घेऊन शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्याच्या सीमाभागात जाण्याची तयारी करू लागला. शत्रू बेसावध असताना राजा आणि सैन्याने एका भल्या मोठ्या जहाजातुन समुद्र मार्गे शत्रू देशात प्रवेश केला. शत्रूच्या सैन्याच्या तुलनेत राजाकडचे सैन्य कमी होते. सगळे जण शत्रूच्या सीमाभागात सुखरुप आल्यावर राजाने ते जहाज जाळून टाकायला सांगितले. सैनिकांना प्रश्न पडला. उद्या पूर्ण पराभव झाला, तर तो परतीचा एकमेव मार्ग होता. परंतु राजाची आज्ञा होती. 

जहाज जाळून टाकण्यात आले. भल्या पहाटेची वेळ होती. शत्रू झोपेत होता. त्यावेळेस राजाने आपल्या सैन्याला गोळा केले व सांगितले, शत्रूच्या तुलनेत आपली सैन्यसंख्या कमी आहे, परंतु आपले सैन्य त्यांच्या सैन्याच्या तुलनेत कणभर सरस आहे. आता आपले परतीचे मार्ग संपलेले आहेत, नव्हे मी ते मुद्दाम संपवले आहेत. आता 'जिंकू किंवा मरू' एवढाच आपल्यासमोर पर्याय आहे. तुम्ही लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माझ्यासोबत आहात?'

सर्व सैन्याचे बाहू स्फुरण पावले आणि सर्वांनी एका ताकदीने, एका सुराने हो म्हटले आणि घनघोर युद्ध झाले. जिवाच्या आकांताने लढणाऱ्या सैनिकांनी शत्रूचा धुव्वा उडवला आणि विजयश्री मिळवली. नवीन देशावर आपला ध्वज फडकावून सगळे सन्मानाने मायदेशी परतले. 

तात्पर्य हेच, की कधी कधी आपल्यालाही आशेचे, परावलंबित्त्वाचे दोर तोडावे लागतात. स्वावलंबी होऊन दिलेला लढा जिंकण्याची जिद्द निर्माण करतो. हे युद्ध आपण रोजच लढतो. फक्त त्यात अभाव असतो स्वावलंबित्वाचा आणि जिद्दीचा!