शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

जगाचे प्रेम मिळो ना मिळो, कुटुंबाचे प्रेम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते चिरंतन टिकणारे असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 2:34 PM

आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि त्यांची ताकद बना. तरच बाह्य जगाशी लढायला सक्षम व्हाल!

आपल्या जडण घडणीत कुटुंबाचा वाटा अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच आपल्या यशाला, प्रगतीला कौटुंबिक पाश्र्वभूमी जबाबदार ठरत़े  जगाचे प्रेम आपल्या यशापयशावर अवलंबून असते, मात्र घरच्यांचे प्रेम चिरंतन टिकणारे असते. मात्र, त्यांनीच अव्हेरले, तर मनुष्याचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून घरातले वातावरण सकारात्मक, प्रेमळ आणि ऋणानुबंध जपणारे असावे लागते. अन्यथा...

एक जवान युद्धासाठी गेलेला असतो. त्याचे घरचे दिवस रात्र बातम्या, वृत्तपत्र यावर लक्ष ठेवून युद्ध कधी संपते आणि आपला जवान सुखरूप घरी कध येईल याची वाट पाहत असतात. दोन महिने युद्ध चालते. एक दिवस बातमी कळते, युद्ध संपले, विजय मिळाला. घरच्यांचे आपल्या मुलाशी बोलणे होते. ते म्हणतात, `तुझी खूप काळजी लागून राहिली होती. तु लवकरात लवकर घरी ये.' 

पलीकडून मुलगा म्हणतो, `हो बाबा मी घरी येणार आहे. पण माझ्या बरोबर एक मित्राला घरी आणतोय. कायमस्वरूपी! युद्धात त्याचा एक हात, एक पाय गेला. त्याला सांभाळायला दुसरे कोणी नाही. त्याला आणले तर चालेल ना?'

वडील म्हणाले, `काही दिवसांसाठी ठीक आहे, पण कायमस्वरूपी नको. नाहीतर तो आपल्याला डोईजड होईल. आपल्याला त्याची सेवा करावी लागेल. त्यामुळे मला वाटते तू त्याला आणूच नकोस, तू एकटा ये.'

जवानाने फोन ठेवला. दोन दिवसांनी त्याच्या घरी पुन्हा फोन गेला. तुमच्या मुलाने आत्महत्या केली आहे. आणि मृत्यूपत्रात लिहिले आहे, की `प्रिय बाबा, युद्धात हात, पाय गमावलेली व्यक्ती माझा मित्र नसून मी स्वत: होतो आणि तुम्हाला डोईजड होणार होतो. याची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. मी माझी मातृभूमीसाठी केलेली सेवा पूर्ण केली, परंतु तुमची सेवा करण्यास मी असमर्थ ठरलो.'

हे ऐकून जवानाच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना स्वत:च्याच विचारांची लाज वाटली. भविष्यात आपली चूक सुधारण्यासाठी त्यांनी दिव्यांगासाठी सेवाश्रम सुरू केला, मात्र आपल्या कोवळ्या वयातल्या मुलाला ते वाचवू शकले नाहीत, ही खंत कायम त्यांच्या मनाला सलत राहिली. 

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती!

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे