शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जगाचे प्रेम मिळो ना मिळो, कुटुंबाचे प्रेम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते चिरंतन टिकणारे असते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:34 IST

आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि त्यांची ताकद बना. तरच बाह्य जगाशी लढायला सक्षम व्हाल!

आपल्या जडण घडणीत कुटुंबाचा वाटा अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच आपल्या यशाला, प्रगतीला कौटुंबिक पाश्र्वभूमी जबाबदार ठरत़े  जगाचे प्रेम आपल्या यशापयशावर अवलंबून असते, मात्र घरच्यांचे प्रेम चिरंतन टिकणारे असते. मात्र, त्यांनीच अव्हेरले, तर मनुष्याचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून घरातले वातावरण सकारात्मक, प्रेमळ आणि ऋणानुबंध जपणारे असावे लागते. अन्यथा...

एक जवान युद्धासाठी गेलेला असतो. त्याचे घरचे दिवस रात्र बातम्या, वृत्तपत्र यावर लक्ष ठेवून युद्ध कधी संपते आणि आपला जवान सुखरूप घरी कध येईल याची वाट पाहत असतात. दोन महिने युद्ध चालते. एक दिवस बातमी कळते, युद्ध संपले, विजय मिळाला. घरच्यांचे आपल्या मुलाशी बोलणे होते. ते म्हणतात, `तुझी खूप काळजी लागून राहिली होती. तु लवकरात लवकर घरी ये.' 

पलीकडून मुलगा म्हणतो, `हो बाबा मी घरी येणार आहे. पण माझ्या बरोबर एक मित्राला घरी आणतोय. कायमस्वरूपी! युद्धात त्याचा एक हात, एक पाय गेला. त्याला सांभाळायला दुसरे कोणी नाही. त्याला आणले तर चालेल ना?'

वडील म्हणाले, `काही दिवसांसाठी ठीक आहे, पण कायमस्वरूपी नको. नाहीतर तो आपल्याला डोईजड होईल. आपल्याला त्याची सेवा करावी लागेल. त्यामुळे मला वाटते तू त्याला आणूच नकोस, तू एकटा ये.'

जवानाने फोन ठेवला. दोन दिवसांनी त्याच्या घरी पुन्हा फोन गेला. तुमच्या मुलाने आत्महत्या केली आहे. आणि मृत्यूपत्रात लिहिले आहे, की `प्रिय बाबा, युद्धात हात, पाय गमावलेली व्यक्ती माझा मित्र नसून मी स्वत: होतो आणि तुम्हाला डोईजड होणार होतो. याची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. मी माझी मातृभूमीसाठी केलेली सेवा पूर्ण केली, परंतु तुमची सेवा करण्यास मी असमर्थ ठरलो.'

हे ऐकून जवानाच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना स्वत:च्याच विचारांची लाज वाटली. भविष्यात आपली चूक सुधारण्यासाठी त्यांनी दिव्यांगासाठी सेवाश्रम सुरू केला, मात्र आपल्या कोवळ्या वयातल्या मुलाला ते वाचवू शकले नाहीत, ही खंत कायम त्यांच्या मनाला सलत राहिली. 

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती!

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे