शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

वाईटांशी चांगले आणि चांगल्यांशी वाईट का घडते? वाचा त्यामागचे कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 10:36 AM

जे होते ते चांगल्यासाठी असे आपण म्हणतो, पण जेव्हा स्वतःची समजूत घालायची वेळ येते तेव्हा हे विसरतो. त्यासाठीच ही उजळणी!

आपण सगळेच जण दुसऱ्याचे सुख पाहून असूया धरून बसतो. खजील होतो, दुःखी होतो, स्वतःला कमी लेखू लागतो. एवढेच काय तर नशिबाला दोष देऊ लागतो. विशेषतः तेव्हा, जेव्हा चांगले वागणारे लोक अपयशी आणि वाईट वागणारे लोक यशस्वी होताना दिसतात. पण हे असे का घडते, याबद्दल एकदा महर्षी नारदांनी भगवान विष्णूंना विचारणा केली... 

देवा न्याय देताना तुम्ही कधी कधी चुकता असे मला वाटते. विष्णू म्हणाले, ''नारदा माझी चूक मला निदर्शनास आणून दे मी नक्की दुरुस्त करतो!'' नारद म्हणाले, ''देवा हे केवळ माझे म्हणणे नाही तर समस्त पृथ्वीवासियांचे म्हणणे आहे. एक उदाहरण देतो.''

''काही वेळापूर्वी एक गाय एका खड्ड्यात अडकली होती. अशा अवस्थेत एक चोर तिथून गेला. त्याने गायीला पाहिलं आणि दुर्लक्ष करून निघून गेला. शिवाय काही अंतर पुढे गेल्यावर त्याला सोन्याच्या मोहरांची थैलीसुद्धा मिळाली. याउलट, एक साधू तिथून जात असताना त्याने गायीला अडचणीत पाहिलं, तो मदतीला गेला त्याने गायीला बाहेर काढली, पण स्वतः मात्र खड्ड्यात अडकला. हा तुमचा कुठला न्याय आहे सांगा???''

विष्णू हसले आणि म्हणाले, ''नारदा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं! अरे तुला त्या चोराला मिळालेल्या मोहरा दिसल्या, पण त्याचे काय नुकसान झाले ते मला माहितीय. त्या चोराने गायीला वाचवले असते, तर ते पुण्य कामी येऊन त्याला मोठा खजिना हाती लागणार होता. पण त्याला मोहरांचा पुरचुंडीवर समाधान मानावे लागले. आणि साधूंच्या बाबतीत म्हणशील, तर साधूंनी केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांचा आज मृत्यू लिहिलेला होता, पण खड्ड्यात पडण्यावर ते संकट निभावलं. अंगाला चिखल लागले पण मृत्यू टळला. त्यामुळे नारदा, आपण प्राप्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. पण मला प्रत्येक जिवाच्या वर्तमानाचीच नव्हे तर भविष्याचीही काळजी असते. त्यांच्या कर्मानुसार मी फळ देत असतो!"'

तात्पर्य हेच, की ''आपल्या बाबतीत काही वाईट आणि वाईट वागणाऱ्यांच्या बाबतीत काही चांगले घडताना दिसले म्हणून नाराज होऊ नका. त्यांनी कोणता खजिना गमावला आणि तुम्ही नकळत कोणत्या संकटावर मात केली, याची तुम्हालाही कल्पना येणार नाही. म्हणून फक्त सत्कर्म करत राहा. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे लक्षात ठेवा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी