शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
3
जुलै महिन्यात मोठा जलप्रलय येणार; जपानी भविष्यवेत्त्याने जगाला हादरवून सोडले, एवढे देश...
4
'ही' दिग्गज कंपनी पगारवाढ करणार नाही, तरीही ४२ हजार ट्रेनींची होणार भरती; १ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशन
5
"मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."
6
"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय
7
वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
8
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर पंचग्रही योगाचा लाभ; सुवर्ण संधी, बाप्पा शुभ करेल!
9
'या' बिझनेस वुमनने रात्रीत 'अंबानीं'ना टाकलं मागे; देशातील सर्वात श्रीमंत महिला; किती आहे संपत्ती?
10
₹३.९२ वर आला ₹३२४ वाला शेअर, आता बंद झालं ट्रेडिग; दिवाळखोरी प्रक्रियेतून जातेय कंपनी
11
तब्बल १० वेळा सापाने घेतला युवकाचा चावा; रात्रभर अंगाखालीच साप बसून राहिला, मग... 
12
IPL 2025: विराट कोहलीची Live सामन्यात तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे...
13
life lesson: भगवान बुद्ध म्हणतात, 'स्वत:बरोबर दुसर्‍यांची प्रगती करणे, हा खरा विकासाचा मार्ग!
14
हिरे व्यापारी ते फरार, कोट्यवधींची संपत्ती जप्त; आता किती आहे PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची संपत्ती
15
मध अत्यंत गुणकारी, पण चुकीच्या पद्धतीने खातात ९०% लोक; शरीरासाठी ठरतंय विष
16
देशातील एकमेव ट्रेन.. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व काही मोफत; महाराष्ट्रातून आहे मार्ग
17
कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीचा हल्ला, सांगलीकरांमध्ये घबराट!
18
वक्फ कायदा योग्य असता तर मुस्लिम आज पंक्चर काढत बसला नसता; मोदींचे पहिल्यांदाच वक्तव्य
19
शेतकऱ्याचा मुलगा बनला ED अधिकारी, गावात पहिलीच सरकारी नोकरी; जाणून घ्या यशोगाथा
20
Video - खळबळजनक! घरात घुसून शहीद जवानाच्या पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण

एकादशीचे व्रत का करतात? कसे करतात? आणि काय संकल्प करतात, हे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 13:59 IST

एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे.

एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे.

एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इ. गोष्टी व्यर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो. 

एकादशीचा संकल्प:

या दिवशी `मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्रीपरमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहं करिष्ये' असा संकल्प उच्चारून ताम्हनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही.

एकादशी व्रताची समाप्ती: 

हे व्रत ऐंशीव्या वर्षांपर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली, तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. 

एकादशीची नावे :

प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला २४ एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपास करतो. परंतु, दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आमलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले, तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो. 

एकादशीचा उपास शक्य नसेल तर 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा जप १०८ वेळा अवश्य करा. 

रोगांपासून मुक्ती आणि मोक्ष देणारे आमलकी एकादशीचे व्रत!