शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

कलशाचे पूजन हे पंचमहाभूतांचे पूजन का मानले जाते? या प्रतीकात्मक पूजेची सविस्तर माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 3:01 PM

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात व साक्षीने शुभकार्य घडवतात. प्रत्येक शुभप्रसंगात कार्यारंभी जशी गणरायाची पूजा होते, तसेच कलशाचे पूजन करतात.

घरातील मंगलकार्यात गणरायाबरोबर कलश पूजाही केली जाते. तेव्हा कलश स्थापन करताना हमखास होणारा गोंधळ म्हणजे त्यावर नारळ कोणत्या बाजूने ठेवावा. कलशावर श्रीफळ अर्थात नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. नारळाला पाणी लागेल, इतके पाणी कलशात घालावे. तसेच कलशात दूध पाणी घालावे. एक नाणे टाकावे, नारळाच्या कडेने आंब्याची, विड्याची पाने लावावीत, नारळावरही हळद कुंकू वहावे. कलशावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ वा गहू पसरून त्यावर हळद कुंकू वाहून कलश स्थापित करावा.

कलशपूजेचे महत्त्व :

कलश एक गोलाकार उभट पात्र. कौटुंबिक व सामुहिक शुभकृत्ये व धार्मिक विधीत कलश या वस्तूला अतिशय प्रतिष्ठित स्थान आहे.  विश्वकर्म्याने देवांच्या कलेकलेचे ग्रहण करून निर्माण केल्यामुळे त्याला कलश म्हटले जाते. कलशांची क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, यजमान, कोशसंभव, सोम, आदित्य, विजय असे नऊ प्रकार असून विजय कलश पीठाच्या मध्यभागी स्थापन करतात. बाकीचे पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, उत्तर व दक्षिण अशा क्रमाने अष्टदिशांना स्थापन करतात. 

सुरासूर अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असता अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्म्याने याची निर्मिती केली, अशी कलशाच्या उत्पत्तीची कथा आहे. कलशाच्या ठिकानी ब्रह्मा, गळ्याच्या ठिकाणी शंकर आणि मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण व दशदिशांना वेष्टून घेणारे दिक्पाल वास्तव्य करतात. त्याच्या पोटात सप्तसागर, सप्तद्वीपे, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगादि सरिता व चार वेद असतात. या सर्व देवतांचे कलशांच्या ठिकाणी स्मरण, ध्यान, चिंतन करावे.

मंगल कार्यात, शांतिकर्मात प्रथम धान्यराशीवर कलश प्रतिष्ठित करतात. पुण्याहवाचनाच्या वेळी दोन कलशांची स्थापना करतात. त्या कलशात सोने, रूपे, पाचू, मोती आणि प्रवाळ ही पंचरत्ने घालतात. दुर्वा व पंचपल्लव यांनी तो सुशोभित करून कोरे वस्त्र वेष्टितात. त्यावर पूर्णपात्रे किंवा श्रीफळ ठेवतात. जसे विधान असेल, तशी कलशांची संख्या एकापासून एकशे आठपर्यंत असते. वरूणदेवाची पूजा कलशावरच करतात. कलशाच्या मुखावर ठेवलेले पुष्पपल्लव हे जीवनसमृद्धीचे प्रतीक मानतात.

हिंदू जीवनपद्धतीप्रमाणेच बौद्ध धर्मातील पुरातन प्रतीकांपैकी कलश हे एक प्रतीक आहे. बौद्ध धर्मात पाच मोठे सच्छिद्र कलश पाच ज्ञानी बुद्धांची प्रतीके म्हणून वेदीवर लिहितात. कलश म्हणजे मानवशरीर व जल म्हणजे त्यातील जीवनसत्त्व आहे.

कलशातील पंचरत्ने ही पंचमहाभूते, पंचेंद्रिये, पंचविषय यांची प्रतीके तर कलशातल्या दुर्वा या सकल जीवसृष्टीच्या मुळ्या समजतात. कलशाची संकल्पना भारतीय शिल्पकलेत ठळकपणे दिसून येते. कमलपुष्पांनी मंदित असलेले नक्षीदार कलश सांची, भरदूत, अमरावती येथील बौद्ध शिल्पात आढळतात. मंदिर आणि लेण्यातले स्तंभ मुख्यत्वे कमल आणि कलश यांच्या सुभग संयोगाने घडविलेले आहेत. मंदिराच्या शिकरावर जो कळस असतो तोदेखील कलशच! खाली कलश व त्यावर उभा नारळ ठेवूनच शिखराचे काम पूर्ण होते. आपल्या भारतीय शिल्पातील कलश वाटोळा किंवा अंड्याच्या आकाराचा असतो, तर गांधार शिल्पातला टोकदार असतो. मैत्रेय, बोधिसत्त्व, वसुधारा या बौद्ध देवता व धन्वंतरी हे पौराणिक दैवत कलशधारी आहेत.

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात व साक्षीने शुभकार्य घडवतात. प्रत्येक शुभप्रसंगात कार्यारंभी जशी गणरायाची पूजा होते, तसेच कलशाचे पूजन करतात. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक म्हणजे कलश होय. संत ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व अखेरच्या अध्यायाला 'कलशाध्याय' म्हटले आहे.