शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

घरात धार्मिक विधी झाल्यावर केरसुणी का फिरवू नये? जाणून घ्या शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:16 IST

घरात पूजा, याग, अभिषेक झाल्यावर काही तिथली जागा स्वच्छ करताना आपण केरसुणी न वापरता फडकं वापरतो; पण का? त्यामागील शास्त्र जाणून घ्या. 

>> विष्णू कुडके 

धार्मिक कार्यक्रम झाल्यावर आणि भोजन झाल्यावर त्वरित केर काढू नये असे आपले पूर्वज सांगत असत. आपण आजही तो नियम पाळतो. काही सांडलं, लवंडलं असेल तर फडक्याने गोळा करतो आणि पोतं करून जागा स्वच्छ करतो. मात्र केरसुणी वापरत नाही. यामागितलं शास्त्र जाणून घेऊ. 

'देवी भागवत मध्ये कीटकांना जगदंबेने आणि विष्णूंनी वरदान दीले आहे की यज्ञात जमिनीवर पडलेले अन्न उदा तांदूळ, गहू डाळ हावनीय द्रव्य आदी वर तुमचा अधिकार असेल आणि ते अन्न तुम्ही घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ती होणार नाही! ' त्यामुळे एक कण तरी यज्ञातील द्रव्य कीटकांना मिळाला पाहिजे आणि केर काढल्यावर ते होत नाही, म्हणून केर काढू नये असे शास्त्र आहे.  म्हणून थोडा वेळ किमान दोन घटका केर काढू नये. तर भोजन झाल्यावरच केर काढणे क्रमप्राप्त आहे. 

आणि दुसरे कारण असे की केरसुणी चा ध्वनी शब्द झाला की आवाहित देवता विसर्जन होतात असाही एक नियम आहे. त्यामुळे अगदीच नाईलाज म्हणून केर काढावा लागला च तर मोळाच्या झाडूने हळुवार आवाज होणार नाही अशा पद्धतीने काढावा. 

अशावेळी पर्याय म्हणून फडक्याचा वापर करावा. केर किंवा तत्सम गोष्टी फडक्याच्या साहाय्याने कागदावर किंवा एखाद्या कार्डवर भरून घ्याव्यात. रोज वापरात असलेली केराची सुपली वापरू नये. साध्या कागदावर केर भरून टाकावा किंवा घरातल्या दुसऱ्या कोनाड्यात बाजूला सारावा. मात्र केरसुणीचा उपयोग तत्काळ करू नये.

आपण पूजाअर्चना करतो तेव्हा धर्माशी संबंधित या छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घ्यायला हव्यात. अजाणतेपणी गोष्टी घडतात तेव्हा नाईलाज असतो, परंतु संबंधित विषयांचे ज्ञान मिळाल्यावर चुकांची पुनरावृत्ती करू नये.