शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

घरात धार्मिक विधी झाल्यावर केरसुणी का फिरवू नये? जाणून घ्या शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 4:16 PM

घरात पूजा, याग, अभिषेक झाल्यावर काही तिथली जागा स्वच्छ करताना आपण केरसुणी न वापरता फडकं वापरतो; पण का? त्यामागील शास्त्र जाणून घ्या. 

>> विष्णू कुडके 

धार्मिक कार्यक्रम झाल्यावर आणि भोजन झाल्यावर त्वरित केर काढू नये असे आपले पूर्वज सांगत असत. आपण आजही तो नियम पाळतो. काही सांडलं, लवंडलं असेल तर फडक्याने गोळा करतो आणि पोतं करून जागा स्वच्छ करतो. मात्र केरसुणी वापरत नाही. यामागितलं शास्त्र जाणून घेऊ. 

'देवी भागवत मध्ये कीटकांना जगदंबेने आणि विष्णूंनी वरदान दीले आहे की यज्ञात जमिनीवर पडलेले अन्न उदा तांदूळ, गहू डाळ हावनीय द्रव्य आदी वर तुमचा अधिकार असेल आणि ते अन्न तुम्ही घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ती होणार नाही! ' त्यामुळे एक कण तरी यज्ञातील द्रव्य कीटकांना मिळाला पाहिजे आणि केर काढल्यावर ते होत नाही, म्हणून केर काढू नये असे शास्त्र आहे.  म्हणून थोडा वेळ किमान दोन घटका केर काढू नये. तर भोजन झाल्यावरच केर काढणे क्रमप्राप्त आहे. 

आणि दुसरे कारण असे की केरसुणी चा ध्वनी शब्द झाला की आवाहित देवता विसर्जन होतात असाही एक नियम आहे. त्यामुळे अगदीच नाईलाज म्हणून केर काढावा लागला च तर मोळाच्या झाडूने हळुवार आवाज होणार नाही अशा पद्धतीने काढावा. 

अशावेळी पर्याय म्हणून फडक्याचा वापर करावा. केर किंवा तत्सम गोष्टी फडक्याच्या साहाय्याने कागदावर किंवा एखाद्या कार्डवर भरून घ्याव्यात. रोज वापरात असलेली केराची सुपली वापरू नये. साध्या कागदावर केर भरून टाकावा किंवा घरातल्या दुसऱ्या कोनाड्यात बाजूला सारावा. मात्र केरसुणीचा उपयोग तत्काळ करू नये.

आपण पूजाअर्चना करतो तेव्हा धर्माशी संबंधित या छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घ्यायला हव्यात. अजाणतेपणी गोष्टी घडतात तेव्हा नाईलाज असतो, परंतु संबंधित विषयांचे ज्ञान मिळाल्यावर चुकांची पुनरावृत्ती करू नये.