शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 10:48 PM

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. पण असं अन्न चुकूनही खाऊ नेय...

बहुतेक घरांमध्ये पती-पत्नी एकाच ताटात जेवण करतात. एका ताटात जेवण केल्याने परस्पर प्रेम वाढते, असे त्यांना वाटते. तथापि, वडीलधारी मंडळी आणि धर्मशासत्राचे जाणकारही सांगतात, की पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. पण असे का म्हटले जाते? या संदर्भात लोकांना अनेकदा माहिती नसते. खरे तर, महाभारतातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये.

पती-पत्नीने एकाताटात जेवण करू नये... -एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते, हे मुळीच नाकारता येणार नाही. पितामह भीष्म यांनाही हे माहीत होते. पण त्यांचे म्हणणे होते, की प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये असतात. यामुळे, जर ही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील, तर पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. खरे तर, पत्नीसोबत एका ताटात जेवण केल्याने पतीसाठी, कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत तिच्याबद्दलचे प्रेम सर्वोपरि होते. यामुळे व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकत नाही. जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वोपरि झाले तर कुटुंबात विसंवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये.

कुटुंबाने सोबत बसून जेवण करायला हवे - कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. सोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पण भावनाही प्रबळ असते. यामुळे कुटुंबाची प्रगतीही होते, असे भीष्म पितामह यांचे मत होते. असं अन्न चुकूनही खाऊ नेय - भीष्म पितामह यांच्या मते, जर कुणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते चिखलाप्रमाणे दूषित होते. ते जनावरांना द्यायला हवे. याशिवाय, जर कुणी जेवणाच्या ताटाला पाय मारून गेले, तर अशा अन्नाला हात जोडून नमस्कार करावा व ते टाकून द्यावे. असे अन्न दारिद्र आणते.

 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारfoodअन्नFamilyपरिवार