शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे
2
“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ
3
शिवसेना मी वाढवली, दानवे नंतर आले अन् काड्या...; चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार
4
सौदीचा राजदूत बांगलादेशच्या मॉडेलच्या पडला प्रेमात; लग्नाची मागणी घातली अन् संबंध बिघडले, ती हसिना जेलमध्ये...  
5
दत्त जयंतीचा जन्म, समर्थ रामदास स्वामींचे दर्शन; गुरुनिष्ठेचा परम आदर्श श्रीधर स्वामी महाराज
6
रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO
7
८८ वर्षांच्या पत्नीचा 91 वर्षीय पतीवर अनैतिक संबंधांचा आरोप, रागाच्या भरात पतीनं केला चाकू हल्ला; न्यायालय म्हणालं...
8
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
9
कोविड महामारीनंतर भारतात डिझेलच्या मागणीत मोठी घट; काय आहे कारण?
10
लंडनला ड्रामाचं शिक्षण घेतल्याचा हास्यजत्रेत उपयोग झाला का? ईशा डे म्हणाली...
11
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
भांड्यांवरचे काळे डाग फ्रीजमधील छोट्याशा गोष्टीने पटकन होतात गायब, रेस्टॉरंट्समध्ये वापरतात अशी भन्नाट युक्ती
13
एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा
14
सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज
15
जुलै महिन्यात मोठा जलप्रलय येणार; जपानी भविष्यवेत्त्याने जगाला हादरवून सोडले, एवढे देश...
16
PF क्लेम, व्हेरिफिकेशन... EPFO चे तीन मोठे नियम बदलले, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम
17
हैदराबादची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
18
Terence Lewis : "मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."
19
'ही' दिग्गज कंपनी पगारवाढ करणार नाही, तरीही ४२ हजार ट्रेनींची होणार भरती; १ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशन
20
"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय

मासिक पाळीच्या काळात पतीने आपल्या पत्नीला बघूही नये, असा नियम पूर्वी का पाळला जात होता? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:52 IST

लैंगिक संबंध आणि त्यासंदर्भातील धर्मशास्त्रीय नियम यामागे सखोल अभ्यास आणि दूरदृष्टीने विचार होता, कसा ते जाणून घ्या. 

>> सागर सुहास दाबके

कुठेही स्त्री पुरुष लैंगिक संबंधांचा विषय निघाला की त्याबद्दल खरंतर गांभिर्याने बोलायला हवं, नीट अभ्यास असायला हवा, पण नेहमी असे दिसते, की हा विषय निघाला कि थट्टा करायची अतोनात हुक्की येते लोकांना।

एका ठिकाणी गर्भाधान संस्कार होता. सकाळी संस्कार झाला आणि संध्याकाळी त्या यजमानाचेच मित्र गप्पा मारताना म्हणाले, ''आज सकाळीच गर्भाधान झालंय, आज रात्री बेत लावेल गडी, आज काय तो गप्पा मारायला येत नाही'', असे म्हणून हसले आणि एकमेकांना टाळ्या दिल्या. हे सगळं त्यातील एकाची पत्नी ऐकत होती, त्यांचं नुकतंच लग्न झालेलं, ती नंतर म्हणाली, ''ही अशी आपल्या वैयक्तिक गोष्टींची थट्टा होणार असेल तर मला नाही करायचे कुठले संस्कार!"

अशाप्रकारच्या शेरेबाजीमुळे चांगल्या गोष्टी बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टींबद्दल मनात अढी निर्माण होते. त्याला जबाबदार आपण ठरतो. म्हणून अशा गोष्टींची थट्टा टाळावी, एवढेच नाही तर या संदर्भात कोणाला माहिती हवी असल्यास योग्य तोच सल्ला द्यावा अन्यथा एखाद्याचे सांसारिक जीवन उध्वस्त होऊ शकते. असेच आणखी एक उदाहरण बघा. 

सगळे म्हणतात कि, "संबंध कसे ठेवायचे हे कोणाला शिकवायला लागत नाही, लग्न झालं की ते आपोआप येतं! प्राण्यांना कोण शिकवतं?" हा समज मोडून काढायला हवा, नीट मार्गदर्शन घेतल्याशिवाय प्रजोत्पादनाचा उद्योग करू नये. आणि पतिपत्नी दोघांना सुखप्राप्ती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहेच. 

एकदा एकजण हनिमूनला गेलेला, तिथे गेल्यावर नेमकी त्याची पत्नी बाजूला झाली, म्हणजे तिला पाळी आली. उत्कंठा वाढल्यामुळे संप्रेरकांचे संतुलन बिघडून असे होऊ शकते. दोघेही नवखे असल्याने तो गोंधळून गेला,  त्याने मोठ्या विश्वासाने त्याच्या ओळखीच्या एका जुन्या जाणत्या व्यक्तीला फोन केला, की असं असं झालंय, तर आता काय करू?

त्यावर तो जुना जाणता माणूस हसला आणि म्हणाला, "अरे वा, आता तर अजून मजा येईल, पाळीत स्त्री पण तापलेली असते आणि लुब्रिकंट पण मिळतं " असे एकदम हिणकस आणि खालच्या पातळीचे उद्गार ऐकून तो खिन्न झाला!

ही गोष्ट खरी, की पाळी चालू असताना स्त्रीमध्ये कामभावना वाढलेली असते कारण शरीरसंबंध हा बऱ्याचदा 'पेन किलर' चे काम करतो आणि स्त्री शरीर अत्यंत पीडेत असल्याने त्यातून सुटका होण्यासाठी शरीरसंबंधांची सहज भावना उत्पन्न होते. पण यात मोठी हानी अशी आहे की या काळात संबंध आले तर बऱ्याचदा पाळी थांबते किंवा स्राव होण्याचे प्रमाण कमी होते, अथवा पाळी यायची वेळ जवळ आल्ये आणि त्यात संबंध आले तर पाळी लांबते सुद्धा!

म्हणून आपल्या धर्मशास्त्रात पतीने आपल्या रजस्वला स्त्रीचे मुखदर्शन सुद्धा घेऊ नये असे सांगितले आहे. कारण निर्धारापेक्षा इंद्रिये बलवान असतात हे पूर्वसुरींना माहीत होते. त्यामुळे, 'हे काय नेहमीचंच आहे, यात काय शिकवायचं? इतकी युगानुयुगे प्रजा वाढली ती काय लैंगिक शिक्षण घेऊन?' या भूमिकेचा त्याग करायला हवा! स्त्रीपुरुष संबंधांना थट्टा मस्करी म्हणून न बघता खेळीमेळीने आणि त्याच वेळेस गांभीर्याने हाताळले पाहिजे.