शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
5
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
6
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
7
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
8
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
9
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
10
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
11
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
12
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 26, 2020 22:02 IST

देवाला भेटायचे, तर तळमळ निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र. बंगालीत त्याचा उच्चार नोरेन असा होतो. हा नोरेन बालपणी त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या मठात गेला. त्याचा आवाज अतिशय गोड होता, म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर त्याने रामकृष्ण परमहंस यांच्या समोर एक भजन सादर केले. ते ऐकून रामकृष्णांची समाधी लागली. त्यांचे देहभान हरपलेले पाहून नोरेन आश्चर्यचकित झाला. भजन संपवून त्याने रामकृष्णांना भानावर आणले. रामकृष्ण त्याला म्हणाले, 'नोरेन, थांबू नकोस, आणखी गा...' असे म्हणत असताना त्यांनी नोरेनच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांची जशी समाधी लागली, तशी गाता गाता नोरेनचीदेखील समाधी लागली. एवढेच नाही, तर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. नोरेन जेव्हा भानावर आला, तेव्हा भारावून गेला. 

नोरेनला ती समाधी अवस्था पुन्हा अनुभवायची होती. गुरुदेव म्हणाले, योग्य वेळ आली, की तू आपणहून ती अवस्था अनुभवशील. यावर नोरेनने पुढचा प्रश्न विचारला, 'पण गुरुदेव ती वेळ कधी येईल? मला देव कधी दिसेल?' 

यावर मंद स्मित करून गुरुदेव म्हणाले, 'मी मेल्यावर!'

नोरेन चकित होऊन गुरुदेवांकडे एकटक बघत बसला. त्यानंतर कित्येक महिने नोरेनची गुरुदेवांशी गाठ पडली नाही. मात्र, गुरुजींच्या उत्तराने नोरेन अस्वस्थ झाला. त्याने गुरुदेवांना भेटायचे ठरवले. त्यांचे शिष्यत्व पत्करायचे ठरवले. गुरुंच्या ओढीने नोरेन रामकृष्णांच्या भेटीस गेला. आश्चर्य काय, तर तेदेखील नोरेनची व्याकुळतेने वाट बघत होते. तिथे गेल्यावर पुन्हा नोरेनला तिच अनुभूती आली. क्षणभर ती अवस्था अनुभवल्यानंतर त्याने गुरुदेवांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, 'गुरुदेव, मला देव कधी दिसेल?'

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराजनोरेनचा प्रश्न ऐकून गुरुदेवांनी पुन्हा तेच उत्तर दिले.

आता मात्र, नोरेननी हट्टच धरला. देव पाहिल्याशिवाय त्यांच्या मठातून जाणार नाही, असे त्याने गुरुदेवांना निक्षून सांगितले. आणि तो मठात राहू लागला. आज न उद्या गुरुदेव आपल्याला देव दाखवतील या आशेवर नोरेन रात्रंदिवस वाट पाहू लागला. मात्र, गुरुदेवांचे `मी मेल्यावर' हे उत्तर ऐकून तो अस्वस्थ होत असे. 

एके दिवशी पहाटे गुरुदेव आणि सर्व शिष्य नदीवर स्नानासाठी गेले असता, गुरुदेवांनी नोरेनचे लक्ष नसताना त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. काही क्षण पाण्याखाली राहिल्यावर, नाका-तोंडात पाणी गेल्यावर नोरेन उसळी मारून बाहेर आला आणि म्हणाला, `गुरुदेव, हे काय करताय, मी मरेन ना?'

गुरुदेव स्मित करून म्हणाले, `नोरेन हेच अपेक्षित आहे. देवाला भेटायचे, तर एवढी अस्वस्थता निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो. नोरेनला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि गुरुंच्या ठायी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली. याच नोरेनने गुरुंच्या सान्निध्यात राहून स्वत: देव पाहिला आणि भविष्यात लोकांनाही दाखवला.

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद