शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

'पुढचे ३६५ दिवस मी आनंदातच राहणार आहे' हा असूदे तुमचा मुख्य संकल्प; तो पूर्ण कसा करायचा ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 3:21 PM

ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील.

जोवर तुमचा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत राहाल तोवर पुढचे वर्षच काय, तर आजन्म दुःखीच राहावे लागेल. याउलट स्वतःमध्ये आनंद शोधायला ज्या दिवसापासून सुरुवात कराल, त्या दिवसापासून उर्वरित आयुष्य आनंदातच घालवू शकाल. सुखी समाधानी आयुष्याचे हे साधे समीकरण आहे. आणि ते सोडवणे आपल्याच हातात आहे. हा गुंता सोडवायचा कसा आणि केवळ एक दोन दिवस नाही तर आयुष्यभर आनंदात कसे राहता येईल, यावर विचार आणि कृती करूया. 

नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या संकल्पाच्या यादीत स्वतःला आनंदी ठेवण्याला प्राधान्य द्या. जोवर तुम्ही आनंदी राहणार नाही तोवर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकणार नाही. यासाठी आपण आधी आनंदात कसे राहायचे यावर थोडे चिंतन करू. 

आपल्या सभोवतालचे जग, माणसं, परिस्थिती बदलणे हे आपल्या हातात नाही. त्यांना बदलत बसलो तर आपले आयुष्य संपून जाईल. यासाठी बदलाची सुरुवात आपल्याला स्वतः पासून करावी लागेल. आपल्याला नको असलेले लोक, परिस्थिती वारंवार आपल्यासमोर येत राहणार. परंतु त्याच्याशी सामोरे कसे जायचे हे आपल्या हातात आहे. 

बाह्य परिस्थिती आपण बदलू शकलो नाही, तर आतली अर्थात मनातली परिस्थिती आपण सहज बदलू शकतो. त्यासाठी हवा आत्मसंवाद. ज्याप्रमाणे एखाद्याशी बोलल्यावर मन हलके होते, तसाच संवाद शांतपणे आपण आपल्याशी केला, तर आनंदाची कुपी आपल्याला सापडू शकेल. तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करून आपण स्वतःशी संवाद साधला, तर अकारण काळजी करत असलेली परिस्थिती आपण गमतीशीरपणे पाहू शकतो. उदा. नोकरीवर बॉस, घरात बायको, नवरा, मुलं, सासू सासरे, नातेवाईक जे कोणी आपल्याला त्रास देतात किंवा ज्यांचा आपल्याला त्रास होतो, अशा लोकांकडे मनाच्या पातळीवर गमतीने बघायला शिका. मनातल्या मनात त्यांची टेर ओढली तरी त्यांना कळणार नाही, राग येणार नाही आणि आपल्याही रागाचा निचरा होऊन जाईल. एकदा राग गेला कि त्या व्यक्तीची, परिस्थितीची सकारात्मक बाजू आपण बघू शकू. 

स्वतःशी संवाद साधायचा आहे, तर तो चांगलाच संवाद साधायला हवा. संवाद म्हणजे विचार. आपले विचार सकारात्मक हवे असतील तर आपल्याला बाह्य रूपात धीर गंभीरपणे आणि अंतर्गत मनाला एखाद्या खोडकर मुलाप्रमाणे विषय हलका फुलका करता आला पाहिजे. 'मन चिंती ते वैरी न चित्ती', असे म्हणतात. मग मनात वाईट विचार आणायचेच कशाला? बाह्य जगात राग, लोभ, प्रेम सगळे काही केले तरी अंतर्गत मनाची शांतता अबाधित राहिली पाहिजे. 

यासाठी मनाच्या पातळीवर तटस्थ पणे परिस्थितीचे अवलोकन करा. त्या प्रसंगातली गंमत शोधून त्या क्षणाचा आनंद घ्या. ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील. नवीन वर्षाच्या आणि नवीन आयुष्याच्या शुभेच्छा!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य