शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

१९ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

By admin | Published: January 24, 2017 12:28 AM

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.

९२ प्रकरणांचा समावेश : जनजागृतीचा फटकाइंद्रपाल कटकवार भंडाराशेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो. मात्र जनजागृती अभावी यावर्षी फक्त ९२ पैकी १९ प्रकरणांनाच मंजुरी मिळाली आहे. राज्यशासनाने मागील वर्षीपासून शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली आहे. यात शेतकरी म्हणून महसुल कागदपत्रे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना तसेच वयोगट १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. मात्र याचा लाभ क्वचितच शेतकऱ्यांना मिळत असतो. यात रस्ता, रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरुन पडणे, सर्पदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल व इतर अपघातात मृत्यू पावल्यास अथवा दोन डोळे, दोन्ही अवयव निकामी झाल्यास अथवा शारीरिक व्याधी निर्माण झाल्यास २ लक्षपासून १ लाखांपर्यंत मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. जिल्ह्यात लहान सहान घटना शेतकऱ्यांसोबत घडत असतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता, अपघात विमा योजनेची प्रस्तावांची संख्या लक्षात घेता मंजूर झालेली प्रकरणे अल्प आहेत. यासंदर्भात शासनाने जनजागृतीवर भर देवून शेतकऱ्यांना विमा योजनेबाबद जागृत करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रस्तावाला अंतिम रुप दिल्यानंतर धोरणानुसार एका खाजगी विमा कंपनीमार्फत लाभ दिला जातो.ही योजना शेतकरी कुटूंबीयांसाठी अत्यंत फायद्याची आहे. शासनामार्फत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. शेतकरी केव्हाही या योजनेची माहिती जिल्हाअधीक्षक कृषी कार्यालय अथवा तालुका कृषी कार्यालयातून प्राप्त करु शकतात.-डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा